1) मालकाचे नाव चुकीचे असणे
शेतकऱ्याच्या नावात अक्षरांची चूक, वडिलांचे नाव चुकीचे, पूर्ण नाव नोंदलेले नसणे यामुळे त्या व्यक्तीचा जमिनीवर हक्क सिद्ध होऊ शकत नाही. अशा प्रकरणांमध्ये जमिनीच्या विक्री, वारस नोंदणी किंवा बँक कर्जाच्या प्रक्रियेत अडचणी येतात.
2) वारस नोंद न झालेली असणे
मूळ मालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे वारस नोंदवलेले नसतील, तर जमीन “मृत मालकाच्या” नावेच राहते.यामुळे जमिनीचे हस्तांतरण, विक्री किंवा शेती कर्ज घेणे अशक्य होते. असे प्रकरण न्यायालयात गेल्यास जमिनीवर “विवादित मालमत्ता” म्हणून शिक्का बसू शकतो.
3) जमीनधारकाचे क्षेत्रफळ चुकीचे नोंदलेले असणे
मोजणीमध्ये अचूक नोंद न झाल्यास, प्रत्यक्ष क्षेत्र आणि सातबाऱ्यातील क्षेत्र यामध्ये फरक दिसतो.
यामुळे सीमाभांडे (बाउंड्री डिस्प्युट) निर्माण होतो आणि शेजाऱ्यांशी वाद निर्माण होतो. कोर्टात असा फरक गंभीर ठरू शकतो.
4) गैरप्रकाराने नोंदवलेली कर्ज किंवा सावकारी माहिती
अनेक वेळा जुनी कर्जे उतरवली गेली नसतानाही सातबाऱ्यावर कायम असतात. अशा चुकीच्या नोंदींमुळे कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळत नाही.नवीन कर्जासाठी बँका नकार देऊ शकतात.
5) अतिक्रमण किंवा गैरवापराची नोंद न केलेली असणे
एखाद्या जमिनीवर दुसऱ्याने अतिक्रमण केले असेल आणि ती नोंद सातबाऱ्यात नसेल, तर त्या अतिक्रमणाविरुद्ध कायदेशीर संरक्षण मिळणे कठीण होते. जमीन गैरवापरासाठी (उदा. निवासी वापरासाठी शेती जमीन) वापरली गेल्यास आणि सातबाऱ्यात ती माहिती नसेल, तर ती बेकायदेशीर ठरू शकते.
6) पीक नोंद चुकीची असणे
खरीप/रब्बी हंगामातील पीक योग्य पद्धतीने नोंदवले गेले नसल्यास शासकीय योजना, विमा, नुकसान भरपाईसाठी पात्रता गमावली जाऊ शकते.
7) अद्ययावत नोंदींचा अभाव (मिळकत वाटणी नोंद)
एकाच मिळकतीतील अनेक सहकारी मालक असतील आणि त्यांनी मिळकत वाटणी केली असेल, पण ती सातबाऱ्यावर अद्याप नोंदली गेली नसेल, तर त्या मिळकतीवर वैयक्तिक हक्क सांगणे अवघड होते. यामुळे जमीन विक्री, कर्ज, कागदपत्रे तयार करणे अशक्य होते.
उपाय काय?
नियमितपणे सातबारा तपासावा – विशेषतः खरेदी, विक्री, वारस नोंद, किंवा कर्ज घेण्यापूर्वी.
भूलेख कार्यालयात (तलाठी, मंडळ अधिकारी) तक्रार नोंदवा, जर नोंदी चुकीच्या आढळल्या तर
https://mahabhulekh.maharashtra.gov.in. ऑनलाइन पोर्टलवरून सातबारा डाउनलोड करून पडताळणी करा.
Mumbai,Maharashtra
June 17, 2025 11:15 AM IST