By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतजमिनीवरुन कुटुंबात होणारे वाद मिटणार! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतजमिनीवरुन कुटुंबात होणारे वाद मिटणार! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतजमिनीवरुन कुटुंबात होणारे वाद मिटणार! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

News Desk
Last updated: 2025/05/28 at 2:49 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:May 28, 2025 8:19 AM IST

Agriculture News : राज्य सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आता शेतीच्या वाटणीनंतर होणाऱ्या नोंदणीसाठी आकारली जाणारी नोंदणी फी पूर्णतः माफ करण्यात आली आहे.

News18

मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आता शेतीच्या वाटणीनंतर होणाऱ्या नोंदणीसाठी आकारली जाणारी नोंदणी फी पूर्णतः माफ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ओझं कमी होणार असून कायदेशीर प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होईल.

आत्तापर्यंत शेती आणि बिगरशेती मिळकतींसाठी एकसमान नोंदणी फी आकारली जात होती. ती मिळकतीच्या एकूण मूल्याच्या 1 टक्क्यांपर्यंत, कमाल 30,000 रुपये इतकी होती. शेती मिळकतीसाठी मुद्रांक शुल्क केवळ 100 रुपये असूनही नोंदणी फी माफ नव्हती. यामुळे अनेक शेतकरी वाटपाचे दस्त नोंदवण्याचे टाळत होते. परिणामी भविष्यात कुटुंबांत वाद निर्माण होत होते, व त्यातून कायदेशीर गुंतागुंत व मानसिक त्रास वाढत होता.

मात्र आता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतीच्या वाटणीसंबंधी दस्त नोंदवताना शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक बोजा सहन करावा लागणार नाही.नोंदणी फी माफ झाल्यामुळे अधिकाधिक शेतकरी कायदेशीर नोंदणी करायला प्रोत्साहित होतील, व त्यातून मिळकतीच्या मालकीबाबत स्पष्टता येईल.

शेतजमीन नोंदणीला गती मिळेल

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “शेतकऱ्यांनी वाटपाचे दस्त नोंदवावे, ही प्रक्रिया सोपी करणे आवश्यक होते. नोंदणी फी माफ केल्यामुळे आता शेतजमिनीच्या नोंदणीला अधिक गती मिळेल.”

या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात दरवर्षी 35 ते 40 कोटी रुपयांची घट होण्याची शक्यता आहे. मात्र, शेतकऱ्यांना नोंदणी न केल्यामुळे होणारा त्रास आणि त्यांच्यावर येणारा मानसिक व आर्थिक ताण यापुढे टळणार आहे, हे लक्षात घेता ही महसुली तडजोड सरकारने मान्य केली आहे.

याआधी अनेकदा असे दिसून आले की, वाटणीनंतरही दस्त नोंदणी न झाल्यामुळे पुढे जमिनीच्या हक्कावरून वाद निर्माण होतात. नोंदणी फी माफ केल्याने आता शेतकरी स्वतःच्या मालकीहक्काचे दस्त अधिकृतरित्या नोंदवतील, जे भविष्यातील कायदेशीर अडचणींपासून संरक्षण देईल.

हा निर्णय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून, त्यातून शेतीमालकीचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल. कुटुंबीयांमध्ये वाद टळतील आणि शेतकरी कुटुंबातील नातेसंबंध टिकून राहतील.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

शेतजमिनीवरुन कुटुंबात होणारे वाद मिटणार! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

TAGGED: agriculture, agriculture news, Maharashtra cabinet, marathi agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article जिओहोटस्टार स्फोट: नेटफ्लिक्सजवळ फक्त months. Months महिन्यांत सापडलेल्या २ crore कोटी ग्राहकांना – जिओहोटस्टार स्फोटात 28 कोटी ग्राहकांना फक्त 3 5 महिन्यांत नेटफ्लिक्सच्या जवळ आणले
Next Article व्होडाफोन आयडिया क्यू 4 निकाल 2025: बोर्ड निधी उभारण्याचा एक मोठा निर्णय घेऊ शकतो, मेच्या या तारखेला सर्व पाने उघडली जातील – व्होडाफोन आयडिया क्यू 4 निकाल बोर्ड 30 मे रोजी सेट केलेल्या मोठ्या निधी उभारणीच्या योजनेच्या तारखेचा निर्णय घेण्यासाठी
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

जीएसीएम तंत्रज्ञान: जीएसीएम तंत्रज्ञानाने व्हीएक्सएल एज्युकेटमध्ये 30 % भागभांडवल प्राप्त केले- जीएसीएम तंत्रज्ञान व्हीएक्सएल शिक्षणात 30 टक्के हिस्सा आहे
Business June 25, 2025
Agriculture News : महत्वाची अपडेट! राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काय?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Farmer Success Story: 2 हजार कोंबड्या, चार तासांची मेहनत अन् दरमहा दीड लाखांचा नफा, शेतकऱ्यानं कसा केला यशस्वी प्रयोग?, Video
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?