योजनेचा उद्देश काय?
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करून, पावसाचे पाणी साठवून ते शेतीसाठी वापरता यावे, हाच या योजनेचा प्रमुख हेतू आहे. यामुळे हंगामी पाण्याची उपलब्धता वाढेल आणि शेतकऱ्यांना वर्षभर शेती करणे शक्य होईल.
योजनेचे फायदे
जलसाठा वाढ : शेततळे बांधल्यामुळे पावसाचे पाणी शेतातच साठवता येते, जे नंतर सिंचनासाठी वापरले जाऊ शकते.
उत्पादनात वाढ : शेताला वेळेवर व आवश्यक तेवढे पाणी मिळाल्यास पिकांची वाढ चांगली होते व उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
आर्थिक स्थैर्य : वाढीव उत्पन्नामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान सुधारते.
सरकारी अनुदान : शासनाकडून 50,000 पेक्षा अधिक अनुदान मिळते, जे शेततळे बांधण्याच्या खर्चात मदतीचे ठरते.
दुष्काळी परिस्थितीवर उपाय : विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या भागांमध्ये शेततळ्यांमुळे हवामान बदलाचा फटका कमी करता येतो.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
जात प्रमाणपत्र (एससी/एसटी/ओबीसी असल्यास)
महाराष्ट्रातील रहिवासी प्रमाणपत्र
सातबारा उतारा (किमान 0.60 हेक्टर जमीन असावी)
उत्पन्न प्रमाणपत्र
बँक पासबुक (आधार लिंक असलेले)
दोन पासपोर्ट साइज फोटो
पात्रता काय?
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
किमान 0.60 हेक्टर शेती असणे आवश्यक.
शेतात शेततळ्यासाठी आवश्यक तेवढी मोकळी जागा असावी.
अनुसूचित जाती-जमाती, महिलांना, अपंगांना व सामाजिकदृष्ट्या मागास गटांना प्राधान्य.
अर्ज कसा करायचा?
DBT पोर्टलवर नोंदणी : https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर लॉगिन करून आपले प्रोफाइल तयार करा.
लॉगिन करा : आधार क्रमांक आणि बँक तपशील वापरून लॉगिन करा.
योजना निवडा : ‘सिंचन साधने’ > ‘वैयक्तिक शेततळे योजना’ हे पर्याय निवडा.
शेततळ्याचे माप निवडा : लांबी, रुंदी आणि खोलीचे मोजमाप भरून अर्ज सादर करा.
फी भरणा : अर्ज सबमिट करताना नाममात्र प्रक्रिया शुल्क भरावे लागते.
Mumbai,Maharashtra
June 11, 2025 3:22 PM IST
पाण्याची चिंता मिटणार! शेततळे बांधण्यासाठी सरकार देतंय पैसे, अर्ज कसा आणि कुठे कराल?