केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यासंदर्भात बुधवारी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, बनावट बियाणे व कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात लवकरच सुधारणा केली जाणार आहे.
कायद्यात होणार कडक बदल
कृषी मंत्रालयाचे सचिव देवेश चतुर्वेदी यांनी माहिती दिली की, सरकार बनावट बियाण्यांवर कठोर कायद्यासाठी तयारी करत असून, या अंतर्गत दंड वाढवण्याचा विचारही सुरू आहे. बियाणे कायदा 1966 मध्ये एक वर्षाच्या आत आवश्यक सुधारणा केल्या जाणार आहेत.कीटकनाशक कायदा 1968 मध्ये देखील बदल करून बनावट उत्पादनांच्या विक्रीवर आळा घालण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक टळेल आणि पिकांचे नुकसान होणार नाही.
विकसित कृषी संकल्प अभियानाची आकडेवारी
देशातील 1.43 लाख गावांतील 1.34 कोटी शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. 8,280 शास्त्रज्ञ आणि 2,170 पथकांनी थेट सहभाग घेतला. एकूण 60,281 कृषी कार्यक्रमांचे आयोजन देशभर करण्यात आले.
प्रगतिशील शेतकऱ्यांचे कौतुक, उपक्रम देशभर पोहोचवणार
कृषिमंत्री चौहान यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडून मिळालेल्या सूचना कृषी धोरणं ठरवताना प्रत्यक्ष वापरात आणल्या जातील. याशिवाय, प्रगतिशील शेतकऱ्यांचे अनुभव, प्रयोग आणि तंत्रज्ञान देशभर लोकप्रिय केले जाणार आहे.
आता अधिकाऱ्यांची शेतशिवारात सक्तीची उपस्थिती
शिवराजसिंह चौहान यांनी स्पष्ट केले की, कृषी विज्ञान केंद्रांमधील शास्त्रज्ञांना दर आठवड्याला किमान तीन दिवस शेतांवर भेट देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. स्वतः कृषिमंत्री देखील दर आठवड्याला दोन दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तशीच जबाबदारी देण्यात येणार आहे.
Mumbai,Maharashtra
June 19, 2025 10:11 AM IST
बियाणे, खतांविषयी कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना होणार फायदाच फायदा