मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “राज्य शासन पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जनात घट करण्यासाठी कटिबद्ध आहे. याचाच भाग म्हणून ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ अंतर्गत 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्याचा थेट लाभ राज्यातील 3 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.”
महानिर्मितीची भूमिका आणि सौर प्रकल्प योजना
महानिर्मिती (महानिर्मिती महा. राज्य वीज मंडळ) ही भारतातील 13,880 मेगावॅट क्षमतेसह दुसऱ्या क्रमांकाची राज्य-नियंत्रित विद्युत उत्पादक कंपनी आहे. तिचा विविध स्रोतांमधून औष्णिक, वायू, जल आणि सौर ऊर्जानिर्मितीवर भर आहे.
जागतिक सहकार्य – जीईएपीपी इंडिया (GEAPP India)
रॉकफेलर फाउंडेशन, आयकिया फाउंडेशन आणि बेझोस अर्थ फंड यांच्या सहकार्याने स्थापन. भारतात विकसनशील भागांसाठी न्याय्य व हरित ऊर्जा प्रणाली तयार करण्यावर भर आहे. GEAPP प्रकल्पासाठी Project Monitoring Unit (PMU) व डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार, जे माहिती संकलन, निरीक्षण आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी करतील.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे वैशिष्ट्ये
2025 पर्यंत 30% कृषी फीडरचे सोलरायझेशनचे उद्दिष्ट आहे. 0.5 ते 25 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प वितरण उपकेंद्राच्या 5-10 किमी परिसरात उभारण्यात येणार. दिवसा अखंडित वीजपुरवठा मिळाल्यामुळे शेतीची उत्पादनक्षमता वाढणार.
प्रभावी अंमलबजावणीसाठी यंत्रणा
प्रकल्प व्यवस्थापनासाठी धोरणात्मक संयुक्त समिती स्थापन होणार. सेंट्रल डॅशबोर्ड द्वारे प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याचे.जमीन संपादनापासून पूर्णतेपर्यंतचे दररोज निरीक्षण होणार. सर्व भागधारकांसाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करून वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देणार.
रोजगार संधी व शाश्वत विकास
या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे केवळ वीजपुरवठा सुधारणार नाही, तर ग्रामीण भागात नवीन रोजगार संधींची निर्मिती होणार आहे. तसेच,कार्बन उत्सर्जनात घट होऊन शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे.
Mumbai,Maharashtra
June 25, 2025 8:28 AM IST