By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतकऱ्यांनी हे कार्ड काढले नाहीतर योजनांचा लाभ बंद होणार! वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतकऱ्यांनी हे कार्ड काढले नाहीतर योजनांचा लाभ बंद होणार! वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतकऱ्यांनी हे कार्ड काढले नाहीतर योजनांचा लाभ बंद होणार! वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/06/29 at 10:34 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:June 29, 2025 3:22 PM IST

Farmer ID : केंद्र सरकारने सुरू केलेल्या डिजिटल कृषी अभियानांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल ओळखपत्र (farmer id) तयार करणे अनिवार्य करण्यात येत आहे. हे कार्ड शेतकऱ्यांचे आधार कार्ड, सातबारा, पीक माहिती, बँक खाते आणि शेतीशी संबंधित अन्य कागदपत्रे यांना जोडून बनवले जाणार आहे.

agriculture news

मुंबई : केंद्र सरकारने सुरू केलेल्या डिजिटल कृषी अभियानांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल ओळखपत्र (farmer id) तयार करणे अनिवार्य करण्यात येत आहे. हे कार्ड शेतकऱ्यांचे आधार कार्ड, सातबारा, पीक माहिती, बँक खाते आणि शेतीशी संबंधित अन्य कागदपत्रे यांना जोडून बनवले जाणार आहे. सरकारचा उद्देश शेतकऱ्यांना सगळे लाभ एका व्यासपीठावर सोप्या पद्धतीने मिळवून देणे हा आहे. मात्र, जर एखाद्या शेतकऱ्याने हे ओळखपत्र तयार केले नाही, तर त्याला अनेक महत्त्वाच्या योजना आणि सवलतींपासून वंचित राहावे लागणार आहे.

शेतकरी ओळखपत्र नसलेल्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेत तांत्रिक अडचणी येऊ शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याने हमीभावावर पीक विक्री केली तरी डिजिटल पडताळणीअभावी पैसे अडण्याची शक्यता वाढेल. ओळखपत्रात पिकांचे रेकॉर्ड, जमीन क्षेत्रफळ आणि मालकीची माहिती असणार असल्याने हमीभावाचे पैसे थेट खात्यात जमा करण्यासाठी ही माहिती आवश्यक असणार आहे.

याशिवाय, पीक विमा योजना (PMFBY) आणि नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाईसाठीही हे ओळखपत्र आधार ठरेल. विमा कंपनीकडे दावा करताना पिकांचे डिजिटल नोंदणी रेकॉर्ड पाहिले जाणार आहे. शेतकऱ्याने ओळखपत्र न काढल्यास, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यावर आर्थिक मदत मिळवण्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया खूप जटिल होईल किंवा नुकसानभरपाई नाकारली जाणार आहे.

शेतकरी क्रेडिट कार्ड (KCC) आणि बँक कर्ज मिळवताना सुद्धा अडचणी येतील. सध्या बँकांना शेतकऱ्याच्या जमिनीची व पिकांची खात्रीलायक माहिती हवी असते. हे सर्व तपशील ओळखपत्रामध्ये साठवले जाणार आहेत. जर ओळखपत्रच नसेल, तर बँक अधिक कडक पडताळणी करेल आणि कर्ज प्रक्रियेला वेळ लागू शकतो.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दरवर्षी मिळणाऱ्या 6 हजार रुपयांच्या हप्त्यांची रक्कम थेट खात्यात जमा होते. यासाठी आधार क्रमांक व बँक खात्याबरोबर शेतकरी ओळखपत्र अनिवार्य होणार आहे. डिजिटल पडताळणी न झाल्यास हप्ता रोखला जाणार आहे.

अनुदान योजनांमध्येही अडथळे येणार

ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेती यंत्रसामग्री खरेदी, सेंद्रिय खते आणि बियाणे यावर केंद्र व राज्य शासन विविध अनुदाने देतात. यासाठी अर्ज करण्याची आणि अनुदान वाटपाची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल ओळख प्रणालीवर आधारित असेल. त्यामुळे शेतकरी ओळखपत्र नसल्यास ही अनुदाने मिळवण्यात विलंब किंवा अपात्रता येऊ शकते.

याशिवाय, शेतकऱ्यांनी सरकारी पोर्टलवर नोंदणी, विक्री व्यवहारांची माहिती, जमीन व पिकांची पडताळणी यासाठी ओळखपत्राची गरज असेल. भविष्यात शेतकऱ्यांचे डिजिटल प्रोफाइल तयार करून त्यानुसार कर्ज मर्यादा, विमा हप्ता आणि अनुदान निश्चित केले जाणार आहे.

सरकारने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, हे ओळखपत्र लवकरात लवकर तयार करून डिजिटल प्रणालीशी जोडावे. अन्यथा योजनांचा लाभ मिळवताना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसू शकतो.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 29, 2025 3:22 PM IST

TAGGED: agriculture, farmer id, farmer id update, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती बातमी
Previous Article Property Rules : मालमत्तेची नोंदणी केली म्हणजे तुम्ही मालक झाला असं नव्हे! नवीन नियम काय? वाचा सविस्तर
Next Article तेल आणि वायू क्षेत्रातील आरआयएलची मोठी हिस्सेदारी, आयओसीला देशातील क्रमांक -1 रिफायनिंग कंपनीने मारहाण केली जाऊ शकते – तेल गॅस क्षेत्रातील मोठ्या पैज बॅककॉम
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

ओडिशा सरकारने टाटा स्टीलची १ 190 ०२ कोटींची नोटीस आहे, ज्यास वेस्टर्न मायनिंग ब्लॉकमधील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे – टाटा स्टीलला सुकिंडा खाण ब्लॉक उल्लंघनावर ओडिशा सरकारकडून १ 190 ०२ कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे.
Business July 4, 2025
Agriculture News :मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती, अर्जप्रक्रिया, पात्रता वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
Agriculture News : पावसाळ्यात शेतातील शंख गोगलगायचा प्रभाव कसा कमी करायचा? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांनो! फक्त 50,000 रुपयांत सुरू करा व्यवसाय, आयुष्यभर कराल लाखांत कमाई
टॉप स्टोरीज़ July 4, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?