By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकार या जमिनी परत करणार, अर्ज कुठे करायचा?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकार या जमिनी परत करणार, अर्ज कुठे करायचा?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकार या जमिनी परत करणार, अर्ज कुठे करायचा?

News Desk
Last updated: 2025/07/04 at 7:39 AM
News Desk
Share
3 Min Read

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 220 नुसार, कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आकार पड जमिनी पुन्हा मिळवता येतील. यासाठी जमिनीची मूळ मालकी सिद्ध करून तहसीलदारांकडे अर्ज करावा लागेल. महत्वाचे म्हणजे, या अर्जासाठी एक विशिष्ट मुदत ठरवली आहे. तहसीलदाराकडून नोटीस मिळाल्यानंतर 90 दिवसांच्या आत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. जर 90 दिवसांनंतर अर्ज केला, तर त्या अर्जावर विचार केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पाच टक्के नजराणा भरावा लागेल

शेतकऱ्यांना जमीन परत घेण्यासाठी एकूण बाजारमूल्याच्या पाच टक्के नजराणा म्हणजे शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क भरल्यावरच जमीन परत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रक्रियेचे बारकाईने पालन करावे, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.

जमीन परत मिळाल्यावर काही बंधने लागू असणार

सरकारने जमिनी परत देण्याचा निर्णय घेतला असला तरी काही महत्वाच्या अटी लागू राहतील. त्या खालीलप्रमाणे आहेत.

जमिनीची विक्री किंवा हस्तांतरण पुढील 10 वर्षांपर्यंत करता येणार नाही.

ही जमीन मिळाल्यानंतर सलग 5 वर्षे अकृषक (नॉन-अग्रीकल्चरल) वापरासाठी बदलता येणार नाही.

या कालावधीत जमिनीची मालकी कायम शेतकऱ्यांजवळ राहील, मात्र त्यावर कुठलीही व्यावसायिक किंवा इतर विक्री प्रक्रिया करता येणार नाही.

आकार पड जमीन म्हणजे काय?

राज्य सरकारने शेतकऱ्यांना विहीर बांधकाम, सिंचन आणि शेतीविकासासाठी कर्जपुरवठा केला होता. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी हे कर्ज मुदतीत फेडू न शकल्यामुळे त्यांच्या जमिनी सरकारच्या मालकीत जमा झाल्या. त्या जमिनी सरकारने ‘आकार पड’ म्हणून घोषित करून एका रुपया नाममात्र दराने लिलावाच्या माध्यमातून ताब्यात घेतल्या होत्या. परिणामी हजारो शेतकऱ्यांचे मालकीहक्क रद्द झाले होते.

नवीन निर्णयामुळे त्या शेतकऱ्यांना व त्यांच्या वारसांना जमिनीचा हक्क पुन्हा मिळण्याची संधी मिळाली आहे. मात्र, यासाठी प्रत्येकाने जमिनीचा मालकी हक्क दर्शवणारे पुरावे सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रियेची पद्धत

1) तहसील कार्यालयातून मिळालेली नोटीस वाचून लगेच तयारी सुरू करावी.

2) जमिनीचा 7/12 उतारा, फेरफार नोंद, कर्जफेडीची पावती अशा सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.

3) नोटीस मिळाल्यानंतर 90 दिवसांच्या आत तहसीलदाराकडे अर्ज सादर करावा.

या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, त्यांचे पुन्हा स्वतःच्या जमिनीवर मालकी हक्क प्रस्थापित होतील. मात्र, मुदतीत अर्ज आणि नियमांचे पालन न केल्यास या सवलतीचा लाभ मिळणार नाही, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 04, 2025 1:01 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकार या जमिनी परत करणार, अर्ज कुठे करायचा?

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : स्वतःच्या शेतजमिनीत शेजाऱ्याची जमीन असल्याचे सिद्ध झाले तर काय करायचे? नियम काय सांगतो?
Next Article Property Rules : तुमच्या मालमत्तेवर बळजबरीने अतिक्रमण झालंय का? या पद्धतीने नोंदवा फिर्याद, तातडीने मिळेल न्याय
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

लेन्सकार्टची आयपीओच्या आधीची मोठी हिस्सेदारी, घालण्यायोग्य तंत्रज्ञानामध्ये प्रवेशासाठी लेन्ससह हँड शेक – नेक्स्ट जनरल स्मार्ट ग्लासेस तयार करण्यासाठी एजनालन्ससह घालण्यायोग्य टेक पार्टनरवर लेन्सकार्ट बेट्स
Business July 4, 2025
Farmer Success Story: केवळ भेंडी नाही तर स्मार्ट शेती, शेतकरी कमावतोय दुप्पट उत्पन्न, कसं केलं नियोजन?
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
भारताच्या ग्रीन एनर्जी क्रांतीच्या नेतृत्वासाठी टाटा पॉवर सज्ज आहे, सौर -ईव्हीपासून प्रसारणापर्यंत केलेला एक नवीन विक्रम: चंद्रशेखरन – टाटा पॉवर रेकॉर्ड कामगिरीचे उद्दीष्ट आहे की इंडिया ग्रीन एनर्जी क्रांतीचे नेतृत्व करणे
Business July 4, 2025
ओडिशा सरकारने टाटा स्टीलची १ 190 ०२ कोटींची नोटीस आहे, ज्यास वेस्टर्न मायनिंग ब्लॉकमधील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे – टाटा स्टीलला सुकिंडा खाण ब्लॉक उल्लंघनावर ओडिशा सरकारकडून १ 190 ०२ कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे.
Business July 4, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?