By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: कृषी हवामान : पावसाचा जोर वाढणार! पूर परिस्थितीची शक्यता, या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जाहीर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > कृषी हवामान : पावसाचा जोर वाढणार! पूर परिस्थितीची शक्यता, या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जाहीर
टॉप स्टोरीज़

कृषी हवामान : पावसाचा जोर वाढणार! पूर परिस्थितीची शक्यता, या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जाहीर

News Desk
Last updated: 2025/07/15 at 3:28 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:July 15, 2025 8:34 AM IST

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) 15 जुलैसाठी राज्यभरात विविध भागांतील हवामानाबाबत महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे.

agriculture news

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) 15 जुलैसाठी राज्यभरात विविध भागांतील हवामानाबाबत महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे. यानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या भागात येलो अलर्ट जाहीर केला असून काही ठिकाणी चक्री वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. नद्या, नाल्यांच्या पातळीत वाढ होऊ शकते. किनारपट्टी भागात रहिवाशांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस

पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे शहरात काही सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. पावसामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांनी आपली पिकं सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.

मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

औरंगाबाद, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह होण्याची शक्यता आहे. ढगांच्या उपस्थितीमुळे दिवसभर हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. जरी अतिवृष्टीचा धोका नसला तरीही विजेच्या कडकडाटामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, वादळी वाऱ्यांपासून फळबागा आणि पीकांचे संरक्षण करावे, असे हवामान विभागाचे सांगणे आहे.

विदर्भात पावसाचा रेड अलर्ट

विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. विशेषतः नागपूर व गोंदियामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागांमध्ये रेड किंवा येलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. चंद्रपूर व अमरावतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

शेतकऱ्यांसाठी सूचना

पावसामुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी पाण्याचा निचरा होईल याची योग्य व्यवस्था करावी. जुलैमध्ये पावसाची स्थिती हळूहळू सुधारत असल्यामुळे पेरणीची घाई करू नये, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात. वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडण्याचा धोका संभवतो. फळबागा, शेतातील झाडे यांचे योग्य संरक्षण करावे.

राज्यात पावसाची स्थिती हळूहळू सक्रिय होत असली तरी काही भागांमध्ये अतिवृष्टीचा धोका असल्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. हवामान खात्याच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 15, 2025 8:32 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

कृषी हवामान : पावसाचा जोर वाढणार! पूर परिस्थितीची शक्यता, या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जाहीर

TAGGED: agriculture news, farmer, marathi agriculture news, monsoon 2025, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन: एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल्सन यांनी आपल्या कर्मचार्‍यांना सांगितले की प्रारंभिक अहवालानंतर अटकळ टाळा, एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल्सन यांनी एआय 171 क्रॅश अहवालात कर्मचार्‍यांच्या फोकसचा सल्ला दिला.
Next Article Agriculture News : शेतकऱ्यांची कटकट मिटली! या कार्डाद्वारे योजनांच्या अर्जाला तातडीने मंजुरी मिळणार
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आयसीआयसीआय लोम्बार्ड क्यू 1 निकालः पहिल्या तिमाहीत 7 747.08 कोटी नफा, 70% लाभांश देखील जाहीर केला- आयसीआयसीआय लोम्बार्ड क्यू 1 नफा 29 अंतिम लाभांश प्रति शेअर 7 रुपये घोषित करतो
Business July 15, 2025
Agriculture News : अमेरिकेच्या करारामुळे महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट!
टॉप स्टोरीज़ July 15, 2025
Farmer Success Story: फिरण्यासाठी गेले, नजरेस पडली ड्रॅगन फ्रूटची शेती, शेतकरी आता कमतोय 10 लाखांचं निव्वळ उत्पन्न, Video
टॉप स्टोरीज़ July 15, 2025
एचडीएफसी लाइफ क्यू 1 निकालः वित्तीय वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीत 6 546 कोटी, एकूण प्रीमियम उत्पन्न ₹ 2500 कोटींपेक्षा जास्त – एचडीएफसी लाइफ क्यू 1 निकाल एफवाय 26 निव्वळ नफा तांका ते 14 टक्के 546 कोटी रुपये
Business July 15, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?