By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : कृषीमंत्री कोकाटेंची मोठी घोषणा! राज्यात कृषी समृद्धी योजना राबवणार, कसा होणार फायदा?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : कृषीमंत्री कोकाटेंची मोठी घोषणा! राज्यात कृषी समृद्धी योजना राबवणार, कसा होणार फायदा?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : कृषीमंत्री कोकाटेंची मोठी घोषणा! राज्यात कृषी समृद्धी योजना राबवणार, कसा होणार फायदा?

News Desk
Last updated: 2025/07/16 at 6:00 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:July 16, 2025 11:07 AM IST

Krushi Samruddhi Yojana : मागील काही वर्षांत जुन्या पीक विमा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गैरव्यवस्थेच्या तक्रारी लक्षात घेऊन राज्य सरकारने आता सुधारित पीक विमा योजना आणि कृषी समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

agriculture news

मुंबई : मागील काही वर्षांत जुन्या पीक विमा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गैरव्यवस्थेच्या तक्रारी लक्षात घेऊन राज्य सरकारने आता सुधारित पीक विमा योजना आणि कृषी समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना अधिकाधिक संरक्षण देणे, शेतीतील भांडवली गुंतवणूक वाढवणे आणि कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणे हा आहे, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत दिली.

मागील पीक विमा योजनांमध्ये अनेक शेतकऱ्यांना वेळेत नुकसानभरपाई मिळाली नाही. याबाबत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत राज्य सरकार शेतकऱ्यांना योग्य न्याय देणार का, अशी विचारणा केली होती. यावर उत्तर देताना मंत्री कोकाटे म्हणाले की, जुन्या योजनेत अनेक गैरप्रकार झाले असून काही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर एक लाख कोटींपर्यंत नफा कमावला. हे पैसे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरणे अधिक योग्य ठरले असते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कृषी समृद्धी योजना काय?

या पार्श्वभूमीवर ‘कृषी समृद्धी योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतीतील भांडवली गुंतवणूक वाढवणे आणि त्या अनुषंगाने सिंचन, साठवणूक, वाहतूक, प्रक्रिया उद्योगांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण करणे. शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेवर भर देत, त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न यातून होणार आहे.

नव्या पीक विमा योजनेतील बदल काय आहेत?

नव्या सुधारीत पीक विमा योजनेनुसार शेतकऱ्यांसाठी विमा हप्त्याचे दर खालीलप्रमाणे असतील.

खरीप पिकांसाठी :2%

रब्बी पिकांसाठी :1.5%

नवीन किंवा व्यापारी पिकांसाठी : 5 %

या योजनेतील उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत विमा कंपन्या बदलण्याऐवजी नियमांची काटेकोर अंमलबजावणी व पारदर्शक ट्रिगर प्रणाली वापरण्यावर भर दिला जाईल. यामुळे शेतकऱ्यांना वेळेत व योग्य नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता वाढणार आहे.

स्वतःची विमा कंपनी स्थापन होणार नाही

कृषीमंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केलं की राज्य सरकारची कोणतीही स्वतःची विमा कंपनी स्थापन करण्याची योजना नाही. याऐवजी अस्तित्वातील विमा कंपन्यांवर योग्य नियंत्रण ठेवून अधिक उत्तरदायित्व आणि पारदर्शकता ठेवली जाणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून, जुन्या पीक विमा योजनेतील त्रुटींवर शिक्कामोर्तब करत कृषी समृद्धी आणि सुधारीत विमा योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण, भांडवली मदत, पारदर्शक व्यवहार आणि शेतीसाठी स्थिरता मिळणार आहे. हे पाऊल कृषी क्षेत्राला नवे बळ देणारे ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 16, 2025 10:54 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

कृषीमंत्री कोकाटेंची मोठी घोषणा! राज्यात कृषी समृद्धी योजना राबवणार, कसा होणार फायदा?

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, कृषी, कृषी ताज्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : तुकडा बंदी कायद्याचा फॉर्म्युला ठरला! नवीन नियम काय असणार? मंत्री बावनकुळेंनी सविस्तर सांगितलं
Next Article Agriculture News : PM Kisan चा 20 हप्ता येण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी? लाभार्थी यादी कशी तपासायची?
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

परवडणारे गृहनिर्माण संकट: व्याज दरात कपात आणि कर लाभ परवडणारी घरे बळकट होत नाहीत – व्याज दर आणि कर लाभ देखील परवडणा housing ्या घरांना चालना देत नाहीत
Business July 16, 2025
कंपन्या बाजाराच्या एकत्रीकरणामुळे नफा वाढवतात, किंमतींमध्ये बळकटीकरण – बाजाराच्या एकत्रीकरणामुळे कंपन्यांचा नफा वाढविला जातो.
Business July 16, 2025
Green Chilli Prices: हिरवी मिरची महागली, शेतकऱ्यांसाठी आले चांगले दिवस, किलोला मिळतोय एवढा दर, Video
टॉप स्टोरीज़ July 16, 2025
एल अँड टी टेक क्यू 1 निकालः कंपनीचा निव्वळ नफा. 315.7 कोटी स्थिर, महसूल 16 %वाढला- एलटी टेक क्यू 1 निकाल नफा 315 7 कोटी रुपयांवर आहे 16 पीसी
Business July 16, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?