Last Updated:
Agriculture News : शेती हा केवळ परंपरागत व्यवसाय नसून, योग्य नियोजन आणि मेहनतीने तो एक फायदेशीर उद्यमही ठरू शकतो, हे सिद्ध केले आहे पालांदूरच्या अरुण पडोळे यांनी. त्यांनी मिरचीच्या उत्पादनात गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने यश मिळवले आहे.
मुंबई : शेती हा केवळ परंपरागत व्यवसाय नसून, योग्य नियोजन आणि मेहनतीने तो एक फायदेशीर उद्यमही ठरू शकतो, हे सिद्ध केले आहे पालांदूरच्या अरुण पडोळे यांनी. त्यांनी मिरचीच्या उत्पादनात गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने यश मिळवले आहे,आणि यंदा तर फक्त 2 एकर मिरचीच्या बागेतून तब्बल 3.5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत.
हिरव्या मिरचीपासून लाल मिरचीपर्यंत यशाचा प्रवास
हवामानातील बदल, फुलकिडे, चुरडा-मुरडा रोग, आणि बारीक पाखरे यामुळे मिरची शेती करणे कठीण झाले असताना, अरुण यांनी अनुभवाच्या जोरावर किडीवर नियंत्रण मिळवले. त्यांनी नुकतेच 2 लाख रुपयांची हिरवी मिरची बाजारात विकली.हिरव्या मिरचीचे दर घसरू लागल्यावर त्यांनी तयारीपूर्वक लाल मिरची उत्पादन सुरू केले.
लाल मिरचीचा तोडा आणि वाढती मागणी
मागील तीन दिवसांपासून लाल मिरचीचा तोडा सुरू असून,बाग लालसर फुलली आहे. 15 क्विंटल मिरचीचे उत्पादन अपेक्षित असून,त्यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे. सध्या बाजारात 140-150 रुपये प्रति किलो दराने लाल मिरची विकली जात आहे.पुढील आठवड्यात शेतातूनच थेट ग्राहकांना विक्री करण्याची योजना आहे, ज्यामुळे दलालांशिवाय अधिक नफा अपेक्षित आहे.
उत्पन्नात समसमान वाटा, मजूर आणि शेतकरी दोघांचाही लाभ
या यशस्वी प्रकल्पात 50 मजुरांना 9 महिने रोजगार मिळाला. उत्पादनाच्या अर्धा खर्चात आणि अर्धा नफा अरुण पडोळे यांना मिळणार. कमी पाण्यात योग्य नियोजन आणि मेहनत केल्यास एकराला 1 लाख रुपयांचा नफा मिळवणे शक्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
हिरवी मिरची विक्रीमागील यशाचा अनुभव
बंडू बारापात्रे यांच्या मध्यस्थीने भंडारा व नागपूर मार्केटमध्ये हिरवी मिरची 20 ते 35 रुपये प्रति किलो दराने विकली. एकूण विक्रीतून 2.25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
Mumbai,Maharashtra
April 29, 2025 3:27 PM IST