By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : विजेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : विजेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार
टॉप स्टोरीज़

Agriculture News : विजेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार

News Desk
Last updated: 2025/05/05 at 10:40 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:May 05, 2025 3:13 PM IST

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज फक्त दिवसा मिळणार असून, रात्री वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.


News18

मुंबई : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज फक्त दिवसा मिळणार असून, रात्री वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ही महत्वाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ‘संवाद – उद्योजकांशी’ या कार्यक्रमात केली आहे.

सकाळपासून सूर्यास्तापर्यंतच वीज

अजित पवार म्हणाले, “आत्तापर्यंत आठवड्याचे काही दिवस दिवसा, काही दिवस रात्री वीज दिली जात होती. पण शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा धोका असून, रात्री शेतात जाणं जीवावर बेततं. त्यामुळे आता सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच वीज दिली जाईल आणि रात्री वीजपुरवठा बंद राहील. यामुळे शेतकरी रात्री घरात सुरक्षित झोपू शकतील.”

बिबटे, रानगवे, डुकरांचे हल्ले वाढले

राज्यात बिबटे, रानगवे, रानडुकर यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांवर हल्ले झाल्याचे प्रकार घडले आहेत. रात्री वीजपुरवठा असल्याने शेतकऱ्यांना पाण्यासाठी शेतात जावं लागतं आणि त्यामुळे जीवाची जोखीम वाढते.

शेतकऱ्यांची मागणी अखेर मान्य

शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून दिवसा 12 तास अखंडित वीज पुरवठा करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू असली तरी, वीज पुरवठा प्रामुख्याने रात्री होत असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नव्हता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे जीवन सुरक्षित आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

शेतकरी नेत्यांचा सवाल

शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की, दिवसा वीज देण्याची घोषणा यापूर्वीही झाली होती, पण व्यवहारात ती अंमलात आणली गेली नाही. या वेळी शासनाने फक्त घोषणा न करता, सर्व भागांमध्ये अखंडित आणि नियमित वीज पुरवठा होईल याची खात्री द्यावी.

नवीन धोरणाच्या शक्यता

या निर्णयामुळे राज्यात नवीन वीज वितरण आराखडा तयार केला जाण्याची शक्यता आहे. वीज वितरण कंपन्यांना दिवसा वीज देण्यासाठी स्मार्ट लोड मॅनेजमेंट करावं लागणार असून, उत्पन्न आणि मागणी यामध्ये संतुलन साधणं हे मोठं आव्हान असेल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा दैनंदिन धोका कमी होईल आणि शेतीची उत्पादकता व सुरक्षितता वाढेल, अशी सर्वसामान्य अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

विजेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार

TAGGED: agriculture news, Ajit Pawar, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती बातमी शेती ताज्या बातम्या
Previous Article महिंद्रा आणि महिंद्रा क्यू 4 निकाल: नफा 20%वाढून 2 3,295 कोटींपर्यंत वाढला, ₹ 42,000 कोटींपेक्षा जास्त – महिंद्रा महिंद्रा क्यू 4 निकाल निव्वळ नफा 20 ते%ई 2%ई 2%बी 93295 कोटींनी मजबूत वाहन आणि शेतीच्या कामगिरीवर उडी मारतो
Next Article आयटी कंपनीने 190% लाभांश जाहीर केला! रेकॉर्ड आणि देय तारीख निराकरण – कोफोर्ज लिमिटेडने प्रत्येक शेअरवर%E2%82%B919 लाभांश घोषित केले 12 मे रेकॉर्ड तारीख
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?