शेतकऱ्यांसाठी का आहे उपयुक्त?
बहुतांश शेतकऱ्यांचे उत्पन्न हंगामनिहाय असते. नापिकी, हवामान बदल किंवा बाजारातील अनिश्चितता यामुळे उत्पन्नात चढ-उतार येतो. अशा स्थितीत एकदाच गुंतवणूक करून दर महिन्याला निश्चित रक्कम मिळवणे ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्टीने सुरक्षा देणारी ठरू शकते.
‘जीवन अक्षय’ योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा.
पेन्शन मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक स्वरूपात घेण्याचा पर्याय.
पेन्शन थेट बँक खात्यात जमा कोणतीही अडचण नाही.
स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी संयुक्त गुंतवणूक शक्य.
वयाची अट – 30 ते 85 वर्षे.
गुंतवणूक आणि पेन्शनचे गणित
1 लाख गुंतवल्यास सुमारे 1,000 मासिक पेन्शन मिळते. जर तुम्हाला दर महिन्याला 20,000 पेन्शन हवे असेल, तर अंदाजे 40.72 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नाच्या काळात हळूहळू बचत करून एकदाच गुंतवणूक केली, तर उतारवयात ते मासिक पेन्शनचा लाभ घेऊ शकतात.
काय कागदपत्रे लागतील?
आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो
कोठे अर्ज कराल?
LIC ची अधिकृत वेबसाइट किंवा जवळच्या LIC शाखेत प्रत्यक्ष भेट देऊन
कोण करू शकतो गुंतवणूक?
30 ते 85 वयोगटातील शेतकरी, नागरिक, व्यावसायिक. ज्यांना नियमित उत्पन्नाची गरज आहे, त्यांनी ही योजना निवडावी. लघु व अल्पभूधारक शेतकरीसुद्धा हप्त्याने गुंतवणुकीचा विचार करू शकतात.
दरम्यान, LIC जीवन अक्षय योजना ही शेतकऱ्यांसाठीही एक प्रकारची पेन्शन योजना ठरू शकते. शेती उत्पन्नाची अनिश्चितता लक्षात घेता, निवृत्तीनंतर स्थिर आणि हमी असलेले उत्पन्न मिळवण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.
Mumbai,Maharashtra
May 05, 2025 10:25 AM IST