By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची घोषणा! नवीन योजना राबवली जाणार, काय फायदा होणार?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची घोषणा! नवीन योजना राबवली जाणार, काय फायदा होणार?
टॉप स्टोरीज़

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची घोषणा! नवीन योजना राबवली जाणार, काय फायदा होणार?

News Desk
Last updated: 2025/05/12 at 12:12 PM
News Desk
Share
2 Min Read

योजना घोषित करताना राज्य सरकारने पाच वर्षांसाठी 25 हजार कोटींच्या तरतूदीची घोषणा केली होती. मात्र अलीकडे जारी करण्यात आलेल्या आदेशात, “आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध केला जाईल” असेच नमूद करण्यात आले आहे.

योजनेचा उद्देश आणि विस्तार

ही योजना शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आणि कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी राबवली जात आहे. सन 2018 पासून सुरू असलेल्या या योजनेचा पहिला टप्पा 16 जिल्ह्यांतील 5220 गावांमध्ये राबवण्यात आला होता. जागतिक बँकेच्या सहकार्याने दुसऱ्या टप्प्यात ही योजना आता 21 जिल्ह्यांतील 7201 गावांमध्ये विस्तारली असून, दोन्ही टप्प्यांमध्ये 12 हजारांहून अधिक गावे समाविष्ट झाली आहेत.

नव्या योजनेत कोणती कामे करण्यात येणार?

या योजनेतून शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधा आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रात भर दिला जाणार आहे. खालील उपक्रमांसाठी थेट लाभ दिला जाईल

कृषी यांत्रिकीकरण

शेततळे, ठिबक व तुषार सिंचन

शेडनेट, हरितगृह, पॉलिहाऊस

मल्चिंग पेपर, क्रॉप कव्हर

काढणी पश्चात प्रक्रिया व पॅकहाऊस

कोल्ड स्टोरेज, गोडावून, साठवणूक सुविधा

फळबाग लागवड, शेळीपालन, रेशीम उद्योग

प्लॅस्टिक अस्तरीकरण, काटेकोर शेती

ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि मार्केटिंग साखळी विकास

लाभार्थ्यांसाठी ठरलेले निकष

अत्यल्प, अल्पभूधारक, दिव्यांग आणि महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

जिल्हानिहाय लक्ष्यांकन करून ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वावर लाभ देण्यात येणार.

जिल्हाधिकारी स्तरावर तयार करण्यात आलेल्या आराखड्याच्या आधारे योजनेची अंमलबजावणी केली जाईल.

निधी कुठून येणार?

योजनेच्या अंमलबजावणीसाठी पीकविमा योजनेच्या पुनर्रचनेनंतर वाचलेला निधी आणि तंत्रज्ञान आधारित नैसर्गिक आपत्ती मदतीनंतर शिल्लक रक्कम वापरण्यात येणार आहे. तसेच, आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधीही दिला जाईल.

केंद्र व राज्य योजनांचा समन्वय

ज्या बाबींसाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते, त्यासाठी राज्य योजना पूरक अनुदान देईल. केंद्र अनुदानाचा लाभ घेतल्यानंतर राज्य योजनेचा १०० टक्के भाग केंद्र शासनाच्या निकषांनुसार राबवण्यात येणार आहे.

दरवर्षी 5 हजार कोटींची तरतूद

या योजनेची अंतिम कार्यपद्धती स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे लवकरच जाहीर केली जाणार आहे. या योजनेसाठी दरवर्षी सुमारे 5 हजार कोटींची तरतूद करण्यात येईल. अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची घोषणा! नवीन योजना राबवली जाणार, काय फायदा होणार?

TAGGED: agriculture, agriculture news, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article व्हिडिओ: स्पष्टीकरणकर्ता: पाक सैन्याचा भारतीय ड्रोनसमोर कसा पराभव झाला? ड्रोन्सबद्दल सर्व काही जाणून घ्या – भारतीय ड्रॉनेसच्या समोर फलंदाजी कशी करावी हे स्पष्ट करा पाक सैन्य ड्रॉन्स व्ही बद्दल सर्व काही जाते
Next Article पेटीएम बद्दल 2000 कोटींची मोठी बातमी
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

कॅब कंपन्या विमानतळांच्या मार्गावर आहेत, ब्लुसमार्टच्या सुटकेनंतर, शेती -आयटी पुनर्स्थित करण्यासाठी तयार करणे – कॅब कंपन्या आय एअर एअरपोर्ट अ‍ॅग्रीगेटर्स बाहेर पडल्यानंतर ब्ल्यूस्मार्ट्सची जागा घेण्याची तयारी करतात.
Business June 12, 2025
वारंवार विमान अपघातग्रस्त, सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न – वारंवार विमान अपघाताच्या सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट – एअर इंडिया क्रॅश एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: दोन्ही पायलटांना 9,200 तास उड्डाण करणारे हवाई परिवहन अनुभव होता – दोन्ही पायलटांना 9200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता
Business June 12, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?