By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Property Rules : वडिलोपार्जित जमीन, मालमत्तेवर किती पिढ्यांचा हक्क असतो? कायदा काय सांगतो?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Property Rules : वडिलोपार्जित जमीन, मालमत्तेवर किती पिढ्यांचा हक्क असतो? कायदा काय सांगतो?
टॉप स्टोरीज़

Property Rules : वडिलोपार्जित जमीन, मालमत्तेवर किती पिढ्यांचा हक्क असतो? कायदा काय सांगतो?

News Desk
Last updated: 2025/06/09 at 8:36 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 09, 2025 1:15 PM IST

Agriculture News : बहुतांश लोक मालमत्तेबाबत वारसा आणि वडिलोपार्जित संपत्ती या संकल्पनांना एकाच प्रकारात गृहित धरतात. मात्र, कायद्याच्या दृष्टीने दोघांमध्ये मूलभूत फरक आहे.

News18

मुंबई : बहुतांश लोक मालमत्तेबाबत वारसा आणि वडिलोपार्जित संपत्ती या संकल्पनांना एकाच प्रकारात गृहित धरतात. मात्र, कायद्याच्या दृष्टीने दोघांमध्ये मूलभूत फरक आहे. तुमच्याकडे जर मालमत्ता आजी-आजोबांकडून किंवा इतर नातेवाईकांकडून आली असेल, तर ती संपत्ती ‘वारशाने मिळालेली’ म्हणून ओळखली जाते. परंतु, वडील, आजोबा किंवा पणजोबांकडून मिळालेली मालमत्ता ही ‘वडिलोपार्जित’ संपत्तीच्या श्रेणीत येते.

वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय?

कोणतीही संपत्ती जी पूर्वजांकडून पुढील पिढीकडे आली आहे आणि अद्याप विभाजित झालेली नाही, ती वडिलोपार्जित मानली जाते. विशेष म्हणजे, अशा मालमत्तेवर मुलांचा जन्मतःच हक्क निर्माण होतो. तुम्हाला ही मालमत्ता तुमच्या वडिलांकडून, त्यांच्या वडिलांकडून किंवा त्यांच्याही पूर्वजांकडून मिळालेली असते, तेव्हा ती ‘वडिलोपार्जित’ ठरते.

वारशाने मिळालेली संपत्ती कशी वेगळी?

आई, मामा, आजी किंवा इतर कोणत्याही नातेवाईकांनी मृत्यूनंतर आपली मालमत्ता तुम्हाला दिल्यास ती ‘वारसा हक्काने मिळालेली’ संपत्ती मानली जाते. यात तुम्हाला जन्मतः हक्क मिळत नाही, तर मालमत्ताधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुसार किंवा कायद्याने तुम्ही त्या संपत्तीचे वारसदार ठरता.

काय बेदखल केले जाऊ शकते?

जर संपत्ती वडील वा आईने स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केली असेल, तर ती ‘स्वकष्टाची संपत्ती’ मानली जाते. अशा संपत्तीतून ते आपल्या मुलाला बेदखल करू शकतात. मात्र, वडिलोपार्जित मालमत्तेतून एखाद्या वारसाला बेदखल करणे सहज शक्य नाही. काही विशेष कायदेशीर कारणांअंतीच हे शक्य होते. आणि न्यायालय त्यावर अंतिम निर्णय देते.

कायदेशीर कालमर्यादा व दावा

वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा दाखल करण्यासाठी 12 वर्षांची कालमर्यादा ठरवण्यात आली आहे. मात्र,विशिष्ट परिस्थितीत न्यायालय ही मर्यादा ओलांडूनही दावा मान्य करू शकते.यासाठी ठोस पुरावे आणि कारणे सादर करणे आवश्यक असते.

वडिलोपार्जित दर्जा किती काळ राहतो?

चार पिढ्यांपर्यंत ही मालमत्ता वडिलोपार्जित समजली जाते. पणजोबा, आजोबा, वडील आणि त्यांच्या मुले. मात्र, यामधील कोणीही संपत्तीचे विभाजन केल्यास ती मालमत्ता वैयक्तिक स्वरूपाची होते आणि वडिलोपार्जित दर्जा संपुष्टात येतो.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 09, 2025 1:06 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

वडिलोपार्जित जमीन, मालमत्तेवर किती पिढ्यांचा हक्क असतो? कायदा काय सांगतो?

TAGGED: agriculture news, latest agriculture news, property news, property rules, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती बातमी
Previous Article शिनचे मेड इन इंडिया कपडे जागतिक असतील, रिलायन्स 1000 कारखान्यांचे नेटवर्क तयार करेल – शिनने 1000 कारखान्यांचे नेटवर्क तयार करण्यासाठी जागतिक रिलायन्ससाठी मेड इंडिया फॅशन बनविले.
Next Article एलोन मस्कची स्टारलिंक लवकरच भारतात सुरू केली जाईल, हाय -स्पीड उपग्रह इंटरनेट – इंडिया हाय स्पीड उपग्रह इंटरनेटमध्ये 3000 रुपयांवर गाणे सुरू करण्यासाठी एलोन मस्क स्टारलिंक
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

एफएमसीजीच्या प्रत्येक क्रियेवर एआयचा सखोल परिणामः टाटा ग्राहक – एआयचा एफएमसीजी टाटा ग्राहकांच्या प्रत्येक क्रियेवर खोलवर परिणाम होतो
Business June 18, 2025
आयपीओच्या आधी नफ्यात आलेल्या अर्बन कंपनी, एफवाय 25 मध्ये 240 कोटींचा निव्वळ नफा कमावला; महसूल 38% वाढला – आयपीओच्या अगोदर शहरी कंपनी फायदेशीर ठरते एफआयवाय 25 मध्ये 240 कोटी रुपये निव्वळ नफा
Business June 18, 2025
जाहिरात व्हॉट्सअ‍ॅप स्थितीत येईल – जाहिरात व्हॉट्सअ‍ॅप स्थितीत येईल
Business June 18, 2025
हैदराबाद विमानतळावर १,000,००० कोटींच्या गुंतवणूकीच्या योजनेत मेगा विस्तार, नवीन टर्मिनल आणि धावपट्टी असेल – हैदराबाद विमानतळ १,000००० कोटी गुंतवणूक योजनेत नवीन टर्मिनल आणि रनवे समाविष्ट आहे.
Business June 18, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?