तथापि, काही लाभार्थ्यांना गेल्या काही काळापासून योजनेचे हप्ते मिळणे थांबले आहे. यामागची मुख्य कारणे आणि त्यावर उपाय पुढीलप्रमाणे आहेत:
हप्ते थांबण्याची प्रमुख कारणे आणि उपाय
1) जमिनीचे प्रमाणिकरण (Land Seeding) पूर्ण न होणे – महसूल विभागाशी संपर्क साधून जमिनीचे प्रमाणिकरण करून घ्या.
2) ई-केवायसी (eKYC) पूर्ण न करणे – स्वतः, सीएससी सेंटर किंवा कृषी सहाय्यकाच्या मदतीने eKYC पूर्ण करा.
3) बँक खाते आधारशी लिंक नसणे – बँकेत जाऊन खाते आधारशी लिंक करा किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये DBT सक्षम खाते उघडा.
4) बँक खाते DBT सक्षम नसणे – DBT सुसंगत खाते सुरू करा.
5) बँक खाते बंद असणे – बंद खाते सुरू करून घ्या किंवा नवीन खाते उघडा.
6) बँक खात्याशी दुसऱ्याचे आधार लिंक असणे- बँकेत जाऊन आधार तपासणी व दुरुस्ती करा.
7) नोंदणी नंतर आधारमध्ये बदल करणे- पोर्टल किंवा सीएससी सेंटरद्वारे आधारमध्ये बदल नोंदवा.
8)बँक खाते आणि आधार कार्ड मधील माहिती योग्य व अद्ययावत असावी. तसेच वेळोवेळी eKYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अपात्रतेसंबंधी कोणतीही शंका असल्यास संबंधित कृषी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा.
अडचणी सोडवण्यासाठी संपर्क कुठे साधावा?
ग्राम कृषी सहाय्यक (Village Nodal Officer)
कृषी पर्यवेक्षक (Agricultural Supervisor)
मंडळ कृषी अधिकारी (Block Agriculture Officer)
तालुका कृषी अधिकारी/तालुका नोडल अधिकारी (Taluka Agriculture Officer/PM Kisan Nodal Officer)
Mumbai,Maharashtra
April 29, 2025 12:56 PM IST
तुम्हाला PM Kisan योजनेचे पैसे मिळण्याचे बंद झाले आहे का? मग तातडीने हे काम करून घ्या