Last Updated:
Mango Farming : आंबा हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वाधिक आवडता हंगामी फळ आहे. सामान्यतः मार्च ते जून या काळातच आपल्याला आंब्याचा आस्वाद घेता येतो.
मुंबई : आंबा हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वाधिक आवडता हंगामी फळ आहे. सामान्यतः मार्च ते जून या काळातच आपल्याला आंब्याचा आस्वाद घेता येतो. हंगाम संपल्यावर मात्र बाजारातून आंबा गायब होतो आणि मग ‘फ्रुट ड्रिंक’ किंवा साठवलेल्या पल्पवर समाधान मानावे लागते. मात्र आता ही स्थिती बदलण्याच्या मार्गावर आहे. कारण, एक अशी जात आहे जी वर्षभर फळ देते. आणि तिला म्हटले जाते ‘ATM’ म्हणजेच ‘Any Time Mango’.
‘एटीएम’ आंबा म्हणजे काय?
‘एटीएम’ हा एक संज्ञात्मक शब्द आहे जो थाई आणि रुमानी या वर्षभर फळ देणाऱ्या आंब्याच्या जातींना उद्देशून वापरला जातो. या जाती विशेषतः थायलंडमधून आलेल्या असून, त्यांचे उत्पादन आता भारतातही होत आहे. यामध्ये थाई आंबा ही जात विशेष लोकप्रिय ठरत आहे कारण त्याचे उत्पादन, गुणवत्ता आणि मागणी हे सगळे घटक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत.
थाई आंब्याची वैशिष्ट्ये
थाई जातीचा आंबा दिसायला लांबट,चविला गोडसर आणि गराने संपन्न असतो. या आंब्याच्या सालेला पातळ कडा असून, तो पिकल्यावर पिवळसर दिसतो. एक झाड वर्षभरात अनेक वेळा फळे देते, आणि एका घोसात साधारण 10 ते 12 आंबे लागतात. या आंब्याची चव हापूस किंवा केशर आंब्याइतकी गोड नसली तरी, बिगर हंगामात त्याची बाजारपेठेत चांगली किंमत मिळते.
लागवडीच्या दृष्टीने फायदेशीर
या जातीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची लागवड कुंडीतही करता येते. त्यामुळे शहरी भागातील लोकही आपल्या गच्चीवर किंवा बागेत याची लागवड करू शकतात. पाच वर्षांची झाडे दरवर्षी 200 ते 250 आंबे देतात. यामुळे त्याचे व्यावसायिक महत्त्व अधिक वाढते आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश भागात याची लागवड शक्य असून, विशेषतः ज्या भागात पारंपरिक केशर आंबा चांगला येतो, त्या भागाचे हवामान थाई किंवा रुमानी आंब्याच्या लागवडीसाठी अधिक योग्य मानले जाते.
Mumbai,Maharashtra
May 10, 2025 11:33 AM IST
बाराही महीने आंब्याची चव चाखता येणार! व्हरायटी,लागवडप्रक्रिया जाणून घ्या