धामणगाव (अमरावती), बाभुळगाव (यवतमाळ) आणि पुलगाव (वर्धा) या ठिकाणी, तसेच मध्य प्रदेशच्या सीमेवरील वरुड तालुक्यात दरवर्षी या बोगस बियाण्यांची विक्री होत असल्याचे कृषी विभागाच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विभागाने यंदा अधिक सतर्कता बाळगली असून 15 विशेष पथकांची नियुक्ती करून तपासणीस सुरुवात केली आहे.
कायदेशीरपणे कोणती बियाणे वापरायची?
शेतकऱ्यांना सध्या केंद्र शासन मान्यता प्राप्त बीजी-1 व बीजी-2 वाणांचीच लागवड करण्यास परवानगी आहे. तथापि, बीजी-3 म्हणजेच एचटीबीटी वाणाचा वापर केल्यास तो पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हा ठरतो. यामध्ये 5 वर्षे कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड होण्याची तरतूद आहे.
बोगस बियाण्यांची विक्रीचे प्रकार
दलाल शेतकऱ्यांना भ्रमित करण्यासाठी राउंडअप बीटी, चोर बोटी, बीडगार्ड, एचटीबीटी अशा लोकप्रिय नावाखाली बियाण्यांची विक्री करतात. हे बियाणे अनेक वेळा विनापावती दिले जातात आणि घरपोच पोचवले जातात. त्यामुळे ही बियाणे बेकायदेशीर असल्याचे समजणे कठीण जाते.
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या सूचना
कोणत्याही बियाण्याची खरेदी करताना फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच करावी.
बियाण्याचे पाकीट सीलबंद व मोहोरबंद आहे याची खात्री करावी.
पाकिटावरील अंतिम मुदत व उगवणीची खात्री तपासावी.
एकाच वाणाची मागणी न करता संतुलित निवड करावी, कारण बीजी-२ तंत्रज्ञान सर्व वाणांमध्ये सारखेच असते.
100 मिमी पावसाआधी कापसाची लागवड टाळावी, पूर्वहंगामी लागवड टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फसवणूक झाल्यास काय करावे?
कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर किंवा शंकाास्पद बियाण्यांची विक्री अथवा लागवड आढळून आल्यास तत्काळ जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यामुळे वेळेत कारवाई करून अन्य शेतकऱ्यांना फसवणुकीपासून वाचवता येईल.
Mumbai,Maharashtra
April 29, 2025 11:45 AM IST
शेतकऱ्यांनो सावधान! कापसाच्या HTBT बोगस बियाण्यांमागे ‘या’ चार राज्यांतील दलालांचा हात, वाचा सविस्तर