By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: मान्सून लवकर येतोय पण पेरणीचं काय? करावी कि नाही? वाचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > मान्सून लवकर येतोय पण पेरणीचं काय? करावी कि नाही? वाचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला
टॉप स्टोरीज़

मान्सून लवकर येतोय पण पेरणीचं काय? करावी कि नाही? वाचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला

News Desk
Last updated: 2025/05/17 at 3:47 PM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:May 17, 2025 10:53 AM IST

Agriculture News : महाराष्ट्रात यंदा मान्सून नेहमीपेक्षा काहीसा लवकर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे अनेक भागांत मे अखेरीसच ढगांची हालचाल आणि हलक्या सरींचा प्रारंभ झाल्याचे चित्र दिसत आहे.

News18

मुंबई : महाराष्ट्रात यंदा मान्सून नेहमीपेक्षा काहीसा लवकर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे अनेक भागांत मे अखेरीसच ढगांची हालचाल आणि हलक्या सरींचा प्रारंभ झाल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा आहे. तो म्हणजे मान्सून लवकर आला तर पेरणी लगेच करावी की थोडी वाट पाहावी? या संदर्भात कृषी तज्ज्ञ आणि विभागाने महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे.

लवकर पाऊस म्हणजे खात्रीशीर पावसाळा नव्हे

मान्सूनचे आगमन लवकर झाले तरी त्याचा अर्थ असा नाही की पावसाचा जोर सातत्याने सुरूच राहील. सुरुवातीला काही दिवस पावसाची उघडीप मिळाल्यास बियाण्यांची उगम प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.त्यामुळे पेरणी करताना केवळ पहिल्या सरींवर विसंबून न राहता, पावसाचे स्थिर व पर्याप्त प्रमाणात आगमन झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

कृषी तज्ज्ञांचा सल्ला

कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सल्ला देत आहेत की, खरीप हंगामाची पेरणी करण्यापूर्वी कमीत कमी 75-100 मिमी सततचा पाऊस आणि 2-3 दिवस जमिनीत ओल टिकेल इतका आद्रता स्तर असणे आवश्यक आहे. लवकर पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याचा धोका संभवतो. तसेच, नंतर जर उघडीप आली तर उगवलेली रोपे वाळून जाण्याची शक्यता असते.

जमिनीची तयार स्थिती आणि बियाण्यांची निवड

शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी आपली जमिनीची मशागत पूर्ण करून ठेवावी. पाऊस स्थिर झाल्यानंतर लगेच पेरणी करता येईल यासाठी बियाणे, खते, औषधे यांची साठवणूक वेळेत करून ठेवणे गरजेचे आहे. तसेच, लवकर पेरणीसाठी निवडायची असलेली बियाण्याची जात देखील बदलावी लागते. काही विशिष्ट पीकजाती लवकर पेरणीस योग्य असतात. उदा.लवकर तयार होणाऱ्या सोयाबीन, मूग, उडीद, नाचणी, ज्वारीच्या जाती.

दरम्यान, मान्सूनचे लवकर आगमन निश्चितच एक आशादायक संकेत असला, तरी घाईने पेरणी न करता, परिस्थितीचे सखोल आकलन करूनच निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. अन्यथा पिकाचे नुकसान, आर्थिक तोटा आणि बियाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 17, 2025 10:53 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

मान्सून लवकर येतोय पण पेरणीचं काय? करावी कि नाही? वाचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, latest agriculture news, mansoon, mansoon news, mansoon update, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article यूट्यूबवरून घेतलं ज्ञान, शेतकऱ्याने लावलं ‘हे’ पीक, आता कमवतोय तिप्पट नफा!
Next Article पावसाचं थैमान,शेतकरी हैराण! पुढील 3 दिवस धोक्याचे, या भागांना बसणार सर्वाधिक फटका
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

वारंवार विमान अपघातग्रस्त, सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न – वारंवार विमान अपघाताच्या सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट – एअर इंडिया क्रॅश एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: दोन्ही पायलटांना 9,200 तास उड्डाण करणारे हवाई परिवहन अनुभव होता – दोन्ही पायलटांना 9200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता
Business June 12, 2025
एअर इंडिया प्लेन क्रॅश: एअर इंडिया एअरक्राफ्ट्स अहमदाबाद, क्रॅशच्या एव्हिएशन वर्ल्डमध्ये क्रॅश, टाटा ग्रुप 1 कोटी नुकसान भरपाई देईल – अहमदाबाद एव्हिएशन वर्ल्डमध्ये एअर इंडिया प्लेन क्रॅश टॅट ग्रुपने 1 सीआरएस 1 कॉरोरेसिन देईल.
Business June 12, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?