By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : शेतकऱ्यांनो! या तारखेनंतरच पेरणीला सुरवात करा, कृषी विभागाचे आवाहन
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : शेतकऱ्यांनो! या तारखेनंतरच पेरणीला सुरवात करा, कृषी विभागाचे आवाहन
टॉप स्टोरीज़

Agriculture News : शेतकऱ्यांनो! या तारखेनंतरच पेरणीला सुरवात करा, कृषी विभागाचे आवाहन

News Desk
Last updated: 2025/06/03 at 3:33 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:June 03, 2025 9:03 AM IST

Agriculture News : हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, मॉन्सून सध्या पश्चिम किनारपट्टीवर स्थिरावलेला आहे. केवळ कोकण किनारपट्टी आणि काही मर्यादित भागांमध्ये हलकासा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

News18

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, वातावरणातील बदलामुळे यावर्षी मॉन्सूनचा प्रवास अपेक्षेपेक्षा मंदावलेला असून, किमान 10 जूनपर्यंत तरी तो पुढे सरकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या पेरण्या किंवा लागवडीस सुरुवात करणे धोक्याचे ठरू शकते.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, मॉन्सून सध्या पश्चिम किनारपट्टीवर स्थिरावलेला आहे. केवळ कोकण किनारपट्टी आणि काही मर्यादित भागांमध्ये हलकासा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे, त्यामुळे तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

विशेषतः विदर्भात कमाल तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागांत तापमान 35 ते 40 अंशांच्या दरम्यान राहणार आहे. अशा कोरड्या आणि तापदायक हवामानात पेरण्या सुरू केल्या गेल्यास बीजधारणेवर विपरित परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

“कोरडवाहू शेतकऱ्यांनी खासकरून कोणत्याही अफवा किंवा खोट्या संदेशांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच्या आधारेच पेरणीसंबंधी निर्णय घ्यावा,” असे कृषी विभागाकडून आवर्जून सांगण्यात आले आहे. मागील वर्षी काही भागांमध्ये वेळेआधी पेरण्या करून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे यंदा अधिक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी वैज्ञानिकांनीही याला दुजोरा दिला असून, “मॉन्सून नियमितपणे आणि पुरेशा प्रमाणात पुढे सरकेपर्यंत पेरणी थांबवणेच योग्य,” असे मत नोंदवले आहे. कारण पेरणीनंतर काही दिवस सतत कोरडे हवामान राहिल्यास बीज उगम होण्यापूर्वीच वाळून जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैसे वाया जाण्याचा धोका वाढतो.

सध्या खरिपासाठी तयारी सुरू असून, अनेक ठिकाणी नांगरणी पूर्ण झाली आहे. मात्र, पेरणीसाठी पावसाचा प्रथम आणि स्थिर बरसणा-या टप्प्याची प्रतीक्षा करणे अत्यावश्यक आहे. हवामान खात्याच्या अद्ययावत माहितीचा अवलंब करतच शेतीसंबंधी निर्णय घ्यावेत, असे आवाहन संबंधित प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 03, 2025 9:03 AM IST

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स: इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर अल्बर यांचे अमीरातच्या निवेदनावर बोथट, म्हणाले की, आयएटीए समिटपासून मी अधिक आवाज काढत नाही, द्विपक्षीय हक्क इंडिगो सीईओवर आपल्याला योग्य नाही
Next Article रियल्टी स्टॉकवर दलाली डोळा, आपण 6-9 महिन्यांत 3 1,330 पर्यंत जाऊ शकता
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

कॅब कंपन्या विमानतळांच्या मार्गावर आहेत, ब्लुसमार्टच्या सुटकेनंतर, शेती -आयटी पुनर्स्थित करण्यासाठी तयार करणे – कॅब कंपन्या आय एअर एअरपोर्ट अ‍ॅग्रीगेटर्स बाहेर पडल्यानंतर ब्ल्यूस्मार्ट्सची जागा घेण्याची तयारी करतात.
Business June 12, 2025
वारंवार विमान अपघातग्रस्त, सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न – वारंवार विमान अपघाताच्या सुरक्षिततेवर उद्भवणारे प्रश्न
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट – एअर इंडिया क्रॅश एव्हिएशन कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
Business June 12, 2025
एअर इंडिया क्रॅश: दोन्ही पायलटांना 9,200 तास उड्डाण करणारे हवाई परिवहन अनुभव होता – दोन्ही पायलटांना 9200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता
Business June 12, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?