सातबारा उतारा म्हणजे नेमकं काय?
सातबारा उतारा म्हणजे गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 या दोन महत्त्वाच्या नोंदींचे एकत्रित स्वरूप.
गाव नमुना 7: यामध्ये शेतकऱ्याजवळ किती जमीन आहे,ती कुठे आहे? आणि त्यावर हक्क कोणाचा आहे? याची माहिती असते.
गाव नमुना 12: यामध्ये शेतकऱ्याने त्या जमिनीवर कोणती पिकं घेतली आहेत,याचा तपशील असतो.
ही दोन्ही माहिती एकत्र करून तयार केलेल्या पत्रकाला “सातबारा उतारा” म्हटले जाते.
सातबारा उताऱ्याचा इतिहास काय आहे?
1910 : इंग्रजांच्या काळात ‘जमीन बंदोबस्त योजना’ अस्तित्वात आली. या अंतर्गत जमिनीचे सर्वेक्षण करून प्रत्येक शेतजमिनीला एक विशिष्ट सर्वे नंबर देण्यात आला. त्या वेळच्या जमिनीच्या नोंदींना कडईपत्रक असे म्हटले जात होते.
1930 : इंग्रजांनी जमाबंदी प्रणाली लागू केली. यामध्ये जमिनीच्या मालकी, मोजणी आणि कर आकारणीचा अधिकृत रेकॉर्ड तयार करण्यात आला.त्याचवेळी नवीन खातेपुस्तिका तयार करण्यात आली आणि त्यातूनच सातबारा उतारा अस्तित्वात आला.गेल्या अनेक दशकांपासून हीच प्रणाली चालू आहे.
सातबारा उताऱ्यात काय काय नोंद असते?
गट क्रमांक: प्रत्येक जमिनीच्या भागाला विशिष्ट क्रमांक (सर्वे नंबर) दिला जातो.
भूधारणा पद्धती: जमीन कोणत्या प्रकारच्या भूधारणेत येते, हे नमूद केले जाते. यामध्ये एकूण चार प्रकारांची नोंद असते.
मालकाचे नाव: शेतकऱ्याचे नाव, वडिलांचे नाव, पत्ता इत्यादी माहिती.
एकूण क्षेत्रफळ: जमिनीचे एकूण माप – हेक्टर, आर किंवा गुंठा यामध्ये दिलेले असते.
पिकांची माहिती (गाव नमुना 12): कोणत्या हंगामात कोणते पीक घेतले गेले? याची माहिती सुद्धा असते.
सातबारा उताऱ्याचे महत्त्व
शेती कर्जासाठी आवश्यक: बँक कर्ज घेण्यासाठी सातबारा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे.
अनुदान आणि योजनांसाठी: शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही याची आवश्यकता असते.
जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी: जमीन विकत घेताना किंवा विकताना हक्काची नोंद म्हणून सातबारा आवश्यक असतो.
Mumbai,Maharashtra
जमीन मालकीपासून ते शासकीय योजनांपर्यंत! सातबारा उतारा कसा महत्वाचा ठरतो? वाचा सविस्तर