By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Land Ownership : जमीन मालकी हक्कांमध्ये बदल कधी होतो? नियम काय आहेत? जाणून घ्या सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Land Ownership : जमीन मालकी हक्कांमध्ये बदल कधी होतो? नियम काय आहेत? जाणून घ्या सविस्तर
टॉप स्टोरीज़

Land Ownership : जमीन मालकी हक्कांमध्ये बदल कधी होतो? नियम काय आहेत? जाणून घ्या सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/11 at 8:45 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:May 11, 2025 1:42 PM IST

Agriculture News : राज्यात शेतजमिनीसह सर्व प्रकारच्या मालमत्तेबाबत अनेक वाद उद्भवत असतात. शेतात बांधाच्या जागेचे वाद, शेत रस्त्यांचा वापर, बांधावरील झाडांचा मालकी हक्क अशा विविध कारणांमुळे ही वादग्रस्त परिस्थिती निर्माण होते.याशिवाय मालकी हक्क बदलाच्या घटनाही अनेकदा घडतात,ज्या काही वेळा मूळ मालकाच्या नकळतही घडू शकतात.

News18

मुंबई : राज्यात शेतजमिनीसह सर्व प्रकारच्या मालमत्तेबाबत अनेक वाद उद्भवत असतात. शेतात बांधाच्या जागेचे वाद, शेत रस्त्यांचा वापर, बांधावरील झाडांचा मालकी हक्क अशा विविध कारणांमुळे ही वादग्रस्त परिस्थिती निर्माण होते.याशिवाय मालकी हक्क बदलाच्या घटनाही अनेकदा घडतात,ज्या काही वेळा मूळ मालकाच्या नकळतही घडू शकतात. अनेक वेळा व्यक्ती गावी नसल्याने किंवा नोकरीनिमित्त इतरत्र स्थलांतरित झाल्याने त्यांच्या जमिनीवर इतरांची नावे नोंदवली गेल्याच्या तक्रारीही समोर येतात.

खरंतर जमिनीच्या मालकी हक्कात बदल ठराविक कायदेशीर कारणांमुळे होतो. यामागे काय प्रक्रिया असते आणि हे बदल कसे नोंदवले जातात, याची माहिती सर्व नागरिकांना असणे गरजेचे आहे. खाली दिलेली ही माहिती अशा महत्त्वाच्या बाबी स्पष्ट करते.

1) भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे मालकीत बदल

सरकार सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करते. भूसंपादन व पुनर्वसन कायद्याअंतर्गत ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत संबंधित जमिनीचे मूळ मालकाचे नाव हटवले जाते आणि त्या जागी शासनाच्या संपादन यंत्रणेचे नाव नोंदवले जाते. या मोबदल्यात शेतकऱ्याला बाजारभावानुसार भरपाई दिली जाते. हा मालकी हक्कातला अधिकृत आणि कायदेशीर बदल असतो.

2) खरेदी-विक्री व्यवहारातून मालकीत बदल

जमिनीच्या खरेदी-विक्रीनंतर खरेदीखत तयार केले जाते. यानुसार तलाठी फेरफार घेऊन नवा मालक सातबारा उताऱ्यावर नोंदवतो. फेरफार उताऱ्यात खरेदी-विक्री, वारस नोंदी, बोजा इत्यादी सर्व बदल सविस्तर नमूद केले जातात. मंडळ अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर नवा मालक अधिकृतपणे नोंदवला जातो.

3) वारस नोंदीमुळे मालकीत बदल

मालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांनी 90 दिवसांच्या आत तलाठ्याकडे अर्ज करून वारस नोंद करावी लागते. नोंदीनंतर मयत व्यक्तीच्या नावाऐवजी त्याच्या वारसांचे नाव सातबारा उताऱ्यावर चढवले जाते. यामुळे मालकी हक्कात कायदेशीर बदल होतो.

4) न्यायालयीन खटल्यातून जमिनीचे वाटप

जमिनीचे सहहिस्सेदारांमध्ये वाटप करताना संमती नसल्यास तहसीलदार प्रकरण बंद करून न्यायालयात दाद घ्यायला सांगतो. सीपीसी कायद्याच्या कलम 54 अंतर्गत न्यायालय जमिनीचे वाटप कसे करायचे याचा निर्णय घेते. त्यानंतर प्रशासन जमिनीचे वाटप करून संबंधितांची नावे सातबारा उताऱ्यावर नोंदवते.

5) सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशाने बदल

एखाद्या व्यक्तीने फसवणूक करून बेकायदेशीररित्या मालकी हक्क मिळवला असेल, तर अशा प्रकरणात सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशाने त्या नोंदीमध्ये बदल केला जाऊ शकतो. चुकीच्या दस्तावेजांवरून फेरफार झाल्यास त्याविरोधात अपील करून सुधारित नोंद सातबाऱ्यावर घेतली जाते.

Location :

Mumbai,Maharashtra

TAGGED: agriculture land, agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article IND VS PAK : भारत-पाक तणावाचा कांद्याला फटका! दरात मोठी घसरण, सध्याचा बाजारभाव काय?
Next Article Explainer : सेंद्रिय शेती ही काळाची गरज! शेतकऱ्यांसाठी कशी ठरतेय फायदेशीर? वाचा संपूर्ण विश्लेषण
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आयपीओच्या आधी नफ्यात आलेल्या अर्बन कंपनी, एफवाय 25 मध्ये 240 कोटींचा निव्वळ नफा कमावला; महसूल 38% वाढला – आयपीओच्या अगोदर शहरी कंपनी फायदेशीर ठरते एफआयवाय 25 मध्ये 240 कोटी रुपये निव्वळ नफा
Business June 18, 2025
जाहिरात व्हॉट्सअ‍ॅप स्थितीत येईल – जाहिरात व्हॉट्सअ‍ॅप स्थितीत येईल
Business June 18, 2025
हैदराबाद विमानतळावर १,000,००० कोटींच्या गुंतवणूकीच्या योजनेत मेगा विस्तार, नवीन टर्मिनल आणि धावपट्टी असेल – हैदराबाद विमानतळ १,000००० कोटी गुंतवणूक योजनेत नवीन टर्मिनल आणि रनवे समाविष्ट आहे.
Business June 18, 2025
उपग्रह संप्रेषणाच्या शर्यतीत, व्होडा -आडा, एएसटी स्पेसमोबाईल – व्होडाफोन आयडिया पार्टनर एस्ट स्पेसमोबाईलसह उपग्रह फोन सेवा ऑफर करण्यासाठी भागीदारी
Business June 18, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?