By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: कृषी हवामान : पेरणीसाठी घाई नकोच! पुढील 48 तास धोक्याचे, या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > कृषी हवामान : पेरणीसाठी घाई नकोच! पुढील 48 तास धोक्याचे, या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट
टॉप स्टोरीज़

कृषी हवामान : पेरणीसाठी घाई नकोच! पुढील 48 तास धोक्याचे, या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट

News Desk
Last updated: 2025/06/13 at 4:30 AM
News Desk
Share
2 Min Read

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये

काही दिवसांसाठी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. राज्यातील शेतकरी शेतजमिनीची पूर्व मशागत करून पेरणीसाठी सज्ज झाला आहे. मात्र पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये पेरणी केली तर बियाणे वाहून जाण्याची शक्यता जास्त आहे.त्यामुळे अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा.

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

तळ कोकणात हवामानाचा जोरदार बदल झाल्याचे चित्र दिसत आहे. पुढील 13 ते 17 जूनदरम्यान या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रेड अलर्टचा सामना करावे लागणाऱ्या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड यांचा समावेश असून, या भागांत दरडी कोसळणे, पूरस्थिती निर्माण होणे यासारख्या घटनांचा धोका आहे.

मुंबई व पश्चिम महाराष्ट्रात वातावरणात उलथापालथ

मुंबई, नवी मुंबईसह उपनगरांत आज सकाळपासूनच हलकासा पाऊस सुरू असून, उकाड्यातून काहीसा दिलासा मिळालाय. मात्र, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात हवामान अधिकच अस्थिर होत असून, नाशिक आणि पुणे परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर प्रवास करणाऱ्यांनी अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन आहे.

मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांवर यलो अलर्ट

मराठवाड्यातील लातूर, नांदेड, धाराशिव, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या आठही जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी जोरदार पावसासोबतच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी सतर्क राहावे.

विदर्भात वादळी वाऱ्यांचा इशारा

विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असून, हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.

मान्सून प्रगतीपथावर

सध्या मान्सूनची उत्तर सीमा मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भवानीपट्टणम, पुरी, सॅंड हेड्स बेट आणि बालूरघाट या मार्गावर आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भ, छत्तीसगड व ओडिशातील काही भागांत मान्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात सध्या फारसा बदल नाही, पण त्यानंतर तापमानात 2-3 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

June 13, 2025 9:22 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

पेरणीसाठी घाई नकोच! पुढील 48 तास धोक्याचे, या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट

TAGGED: agriculture, farmer, monsoon 2025, monsoon latest news, monsoon update, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : खरीप पेरणीच्या अगोदर शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? वाचा महत्वाचा सल्ला
Next Article Agriculture News : जमिनीचा सर्च रिपोर्ट कसा काढायचा? अर्जप्रक्रिया,आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या सविस्तर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Agriculture News : PM Kisan च्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
एडीए टोटल गॅस आणि जिओ -बीपी भागीदारी, आता आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मिळेल – अदानी टोटल गॅस आणि जिओ बीपी समान इंधन स्थानकांवर पेट्रोल डिझेल आणि सीएनजी ऑफर करण्यासाठी
Business June 25, 2025
Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?