मुंबई व कोकण परिसर
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून,
रत्नागिरीसाठी रेड अलर्ट
पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
घाटमाथा व पश्चिम महाराष्ट्र
पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, अहिल्यानगर (नगर) आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. धुळे आणि नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यांसह हलक्यापासून मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा
मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही भागांत जोरदार पाऊस होणार आहे.
विदर्भ
विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पावसामुळे परिस्थिती
राज्यातील बहुतांश भागांत गेल्या 4–5 दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचणे, वाहतूक खोळंबणे, वीज पुरवठ्यात अडथळे अशा समस्या उद्भवत आहेत. मात्र दुसरीकडे, शेतकऱ्यांसाठी ही पावसाची चाहूल दिलासादायक ठरत असून, अनेक भागांत खरिप हंगामाच्या पेरण्या वेगाने सुरू झाल्या आहेत.
Mumbai,Maharashtra
June 15, 2025 8:10 AM IST
पेरणीसाठी धीर धरा! पावसाचा जोर वाढणार, IMD कडून 23 जिल्ह्यांना येलो अलर्ट तर 1 जिल्ह्याला रेड अलर्ट