By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Property Rules : सावधान! या 7 कारणांमुळे कुटुंबातील सदस्याला मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Property Rules : सावधान! या 7 कारणांमुळे कुटुंबातील सदस्याला मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही
टॉप स्टोरीज़

Property Rules : सावधान! या 7 कारणांमुळे कुटुंबातील सदस्याला मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही

News Desk
Last updated: 2025/07/01 at 8:23 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:July 01, 2025 1:36 PM IST

Property News : एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना मालमत्तेवर हक्क मिळवण्यासाठी वारस नोंदणी करता येते. जर मृत व्यक्तीनं मृत्यूपत्र लिहिलं असेल, तरीसुद्धा कुटुंबातील वारसांना त्यांच्या हक्काचा हिस्सा मिळण्याचा अधिकार असतो.

agriculture news

मुंबई : एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना मालमत्तेवर हक्क मिळवण्यासाठी वारस नोंदणी करता येते. जर मृत व्यक्तीनं मृत्यूपत्र लिहिलं असेल, तरीसुद्धा कुटुंबातील वारसांना त्यांच्या हक्काचा हिस्सा मिळण्याचा अधिकार असतो. तसेच, एकत्र कुटुंबातील एखाद्यानं हक्कसोड पत्र केलं असेल, तरी इतर सदस्यांना आपापला वाटा घेता येतो.

मात्र असे 7 प्रमुख प्रसंग आहेत. ज्यामुळे वारसाला मालमत्तेचा हक्क मिळत नाही. चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दलची अधिक माहिती

1) स्वतःहून कमावलेली मालमत्ता

एकत्र कुटुंबातील व्यक्तीनं स्वतः कमावलेली मालमत्ता आपल्या हयातीत विकली, बक्षीस दिली किंवा मृत्यूपत्रानं इतर कुणाला हस्तांतरित केली, तर त्याच्या मृत्यूनंतर वारसांना त्या मालमत्तेत कोणताही हक्क राहत नाही.

2) वडिलोपार्जित मालमत्ता विक्री

वडिलोपार्जित मालमत्ता कुटुंबातील प्रमुख व्यक्तीनं पुढील कारणांसाठी विकली असेल, तर त्यावर हक्क मागता येत नाही. गंभीर आजाराचा खर्च, कर्जफेड, न्यायालयीन खर्च अशा कायदेशीर गरजांसाठी. पडझड झालेलं घर दुरुस्त करणे, नवीन घर बांधणे, नापीक जमिनीऐवजी उपजाऊ जमीन घेणे अशा मालमत्तेच्या फायद्यासाठी.

3) खुनाचा आरोप

जर वारसानेच आई-वडिलांचा खून केला असेल किंवा मदत केली असेल, तर त्याला मालमत्तेत कोणताही वाटा मिळत नाही. अशा प्रकरणात खून करणारा वारस नसल्यासारखा मानला जातो.

4) धर्मांतर

हिंदू कुटुंबातील सदस्याने दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला, तर त्या व्यक्तीच्या अपत्यांना हिंदू कुटुंबातील मिळकतीत हिस्सा मिळत नाही.

5) हक्कसोड पत्र

एखाद्या सदस्याने स्वखुशीने आपला वाटा सोडून हक्कसोड पत्र दिल्यास, त्याला किंवा त्याच्या अपत्यांना पुढे कुटुंबाच्या मालमत्तेत हिस्सा मागता येत नाही.

6) ज्येष्ठ सदस्यांचा सांभाळ न करणारे:

ज्येष्ठ नागरिकाने आपल्या देखभालीच्या आशेवर मालमत्ता बक्षीसपत्र करून दिली आणि नंतर देखभाल झाली नाही, तर त्या ज्येष्ठ नागरिकाला ती मालमत्ता परत स्वतःच्या नावावर घेण्याचा आणि नातेवाईकांना बेदखल करण्याचा अधिकार असतो.

7) मुदतबाह्य दावा

मालमत्तेवर फक्त ताबा असलेल्या व्यक्तीच्या वारसांनी 12 वर्षांच्या आत दावा दाखल केला पाहिजे.विलंब झाल्यास आणि समाधानकारक कारण न दिल्यास न्यायालय दावा फेटाळू शकतं.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 01, 2025 1:35 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

सावधान! या 7 कारणांमुळे कुटुंबातील सदस्याला मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही

TAGGED: agriculture, agriculture news, property law, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : घरबसल्या शेतजमिनीवर वारसाची नोंद कशी करायची? अर्जप्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या
Next Article Agriculture News : सूरवातीला 50,000 रु खर्च, नंतर लाखांत कमाई, गावठी कुकुटपालन व्यवसायाचे असं करा नियोजन
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : PM Kisan ला लिंक असलेला मोबाईल नंबर बंद झालाय का? या पद्धतीने करा अपडेट, अन्यथा हप्ता अडकणार
टॉप स्टोरीज़ July 2, 2025
ओला-ल्युबर राइड आता खिशात भारी! भाडे 2 पट पुनर्प्राप्त करण्यासाठी सरकारने 2 वेळा सूट दिली
Business July 2, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना अंगावर वीज कोसळण्यापूर्वी तातडीची सूचना मिळणार! नवीन अॅप कसं असणार? मंत्री महाजनांनी सविस्तर सांगितलं
टॉप स्टोरीज़ July 2, 2025
Agriculture News : मोजणी करताना शेजारच्याकडे तुमची जमीन असल्याचे सिद्ध झाले तर काय करायचे?
टॉप स्टोरीज़ July 2, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?