By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : ‘पैसं आल्यावर बाळा तुला चप्पल घेऊ…’, बापानं पिकवलेलं लाल सोनं वाहून गेलं, चिमुकलीच्या डोळ्यात पाणी
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : ‘पैसं आल्यावर बाळा तुला चप्पल घेऊ…’, बापानं पिकवलेलं लाल सोनं वाहून गेलं, चिमुकलीच्या डोळ्यात पाणी
टॉप स्टोरीज़

Agriculture News : ‘पैसं आल्यावर बाळा तुला चप्पल घेऊ…’, बापानं पिकवलेलं लाल सोनं वाहून गेलं, चिमुकलीच्या डोळ्यात पाणी

News Desk
Last updated: 2025/05/25 at 6:23 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:May 25, 2025 11:43 AM IST

Agriculture News : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

News18

बीड :  जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः शिंदेवाडी गावातील शेतकरी महेश दरेकर यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर त्याचा थेट परिणाम झालेला आहे. तीन एकरांवर पाच महिन्यांच्या मेहनतीने उगम पावलेलं कांद्याचं पीक, मॉन्सूनपूर्व पावसामुळे अक्षरशः पाण्यात गेलं आहे.

महेश दरेकर यांनी उसनवारी करून सुमारे 80 ते 90 हजार रुपये खर्च करून कांद्याची लागवड केली होती. कांदा काढणीसाठी तयार झाला होता आणि तो बाजारात नेण्यासाठी शेतात गोळा करून ठेवला होता. पण पावसाने उघडप न दिल्यामुळे जवळपास 300 गोणी कांदा पावसात भिजला. आता तो विक्रीयोग्य राहिलेला नाही. कर्जबाजारी झालेलं कुटुंब आता हाताशी आलेलं उत्पादन देखील गमावल्यामुळे पूर्णतः खचून गेलं आहे.

खतं, बी-बियाण्यांसाठी कुठून पैसा आणायचा?

या कठीण परिस्थितीत दरेकर कुटुंबाला कोणतीही मदत मिळालेली नाही. महेश दरेकर त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीसह भिजलेला कांदा गोळा करत आहेत. पाच महिन्यांची मेहनत, आर्थिक गुंतवणूक आणि आशा या एका मुसळधार पावसाच्या सरीने नष्ट केल्या आहेत. कर्जाचे हप्ते भरायचे आहेत, मजुरांचे पैसे देणे बाकी आहे आणि त्यातच मुलांची शाळा सुरू होण्याची वेळ आली आहे. खतं, बी-बियाण्यांसाठी कुठून पैसा आणायचा, असा असहाय प्रश्न दरेकर कुटुंबासमोर उभा आहे.

शासनाकडे मदतीची मागणी

महेश दरेकर यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तातडीची शासकीय मदत देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “इतकी मेहनत करून उभं केलेलं पीक पावसामुळे वाया गेलं. आमचं सगळं आयुष्य या शेतीवर अवलंबून आहे. आम्हाला शासनाने वेळीच मदत केली नाही, तर पुढच्या हंगामात उभं राहणंही शक्य होणार नाही.”

जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान

फक्त शिंदेवाडीच नव्हे, तर बीड जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये वळवाच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. माजलगाव धरण क्षेत्रात पाण्याची पातळी वाढली आहे, रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

May 25, 2025 11:31 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

‘पैसं आल्यावर बाळा तुला चप्पल घेऊ…’, बापानं पिकवलेलं लाल सोनं वाहून गेलं, चिमुकलीच्या डोळ्यात पाणी

TAGGED: agriculture news, beed latest news, beed news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Agriculture News : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना कोट्यवधींची मदत जाहीर! विभागनिहाय यादी वाचा
Next Article Agriculture News : शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर ‘या’ शब्दांचा उल्लेख नसेल तर तुमचा मालकी हक्क ठरणार बेकायदेशीर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

टोयोटा दुर्मिळ पृथ्वी चुंबकीय कमतर
Business June 25, 2025
सरकार विमा कंपन्यांचा वाटा कमी करेल, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्समधील हिस्सा विकण्याची तयारी करेल आणि जीआयसी रे – सरकार विमा कंपन्यांमधील वाटा कमी करेल
Business June 25, 2025
शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
आर्थिक चिंता असूनही, वाढीची गती कायम आहेः इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी – आर्थिक चिंता असूनही वाढीची गती अखंड इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी
Business June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?