Last Updated:
Agriculture News : शेती व्यवसायाशी निगडित धोके व अपघातांमुळे दरवर्षी अनेक शेतकरी मृत्यूमुखी पडतात किंवा गंभीर जखमी होतात. अशा संकटप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा आधार मिळावा म्हणून राज्य सरकारने ‘शेतकरी अपघात तात्काळ मदत योजना’ नव्या स्वरूपात बदल केले आहेत
मुंबई : शेती व्यवसायाशी निगडित धोके व अपघातांमुळे दरवर्षी अनेक शेतकरी मृत्यूमुखी पडतात किंवा गंभीर जखमी होतात. अशा संकटप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा आधार मिळावा म्हणून राज्य सरकारने ‘शेतकरी अपघात तात्काळ मदत योजना’ नव्या स्वरूपात बदल केले आहेत. ही सुधारित योजना आधीच्या तुलनेत अधिक गतिशील, थेट व सुलभ करण्यात आली आहे.
राज्यात वीज पडणे, पूर, प्राणी हल्ला, अपघात, विषबाधा, सर्पदंश, खून किंवा आत्मरक्षण करताना झालेला मृत्यू यासारख्या अनेक घटनांमध्ये शेतकऱ्यांचा जीव जातो किंवा त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व येते. या घटनांना आर्थिक मदतीचा दर्जा देण्यासाठी ही योजना राबवली जाते. यामध्ये आता सरळ मदत मंजुरीसाठी तालुकास्तरावर समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत, जेणेकरून पीडित कुटुंबाला काही आठवड्यांतच मदतीचा लाभ मिळेल.
किती मिळते मदत?
मृत्यू किंवा दोन्ही डोळे/अवयव निकामी झाल्यास – 2 लाख रुपये
एका डोळा किंवा एका अवयवाची हानी झाल्यास – 1 लाख रुपये
प्रक्रिया व अटी काय?
अपघातानंतर 30 दिवसांच्या आत अर्ज सादर करणे बंधनकारक.
अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
तालुकास्तरावरील समिती तपासणी करून मदतीचा निर्णय घेते.
गरज असल्यास कुटुंबाकडे अतिरिक्त माहिती मागवली जाऊ शकते.
पूर्वी काय समस्या होत्या?
पूर्वी विमा कंपनीकडे प्रस्ताव गेल्यानंतर 1–2 वर्षे निर्णय येत नव्हता. कंपन्या लहानशा चूक दाखवून अर्ज फेटाळायच्या. परिणामी शेतकरी कुटुंब अनेकदा न्यायापासून दूर राहायचे. ही अडचण लक्षात घेऊनच सरकारने आता ‘विमा कंपन्यांशिवाय मदत मंजूरी’ ही नवी दिशा स्वीकारली आहे.
योजना कोणासाठी लागू?
वय 10 ते 75 दरम्यान असलेल्या शेतकरी व त्यांचे कुटुंबीय तसेच संबंधित व्यक्ती शेतीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या संलग्न असावी. अर्ज करताना अपघाताचे पुरावे, मृत्यू दाखला, वैद्यकीय अहवाल, सातबारा इत्यादी आवश्यक
Mumbai,Maharashtra
June 11, 2025 1:32 PM IST