तणांचा धोका आणि सुरुवातीची काळजी
कोणत्याही पिकांची लागवड झाल्यानंतर पहिल्या 4 ते 6 आठवड्यांत तणांचा सर्वाधिक फटका बसतो. या काळात पिकांची मुळे स्थिर नसतात आणि तणं पाण्यापासून सूर्यप्रकाशापर्यंत सर्व स्रोतांवर पिकांशी स्पर्धा करतात. परिणामी, पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनात मोठी घट होते. त्यामुळे पहिल्या 30 ते 45 दिवसांत तण नियंत्रण आवश्यक ठरते.
तण नियंत्रणासाठी प्रभावी उपाय
योग्य मशागत
लागवडीपूर्वी चांगली नांगरणी व कुळवणी केल्यास तण बीज नष्ट होते. मातीतील उगमक्षमता कमी होते.
मल्चिंगचा वापर
प्लास्टिक मल्च किंवा सेंद्रिय मल्च पसरवल्यास सूर्यप्रकाश रोखला जातो. तणांच्या वाढीस अटकाव होतो आणि मातीतील ओलावा टिकून राहतो.
खुरपणी (हाताने किंवा यंत्राद्वारे)
पारंपरिक पण खात्रीशीर पद्धत. जमिनीला हवा मिळते आणि तणं मुळासकट निघतात. मात्र,मजुरीचा खर्च जास्त.रासायनिक तणनाशकांचा योग्य वापर
पूर्व उगम तणनाशक
ऑक्सिफ्लुरोफेन 23.5% ईसी – 1 मि.ली./लिटर
पेंडीमेथालिन 30% ईसी – 3 मि.ली./लिटर
उगमानंतरचे तणनाशक
क्लोडिनाफॉप प्रोपार्गिल, प्रोपॅक्विझाफॉप, क्विझालोफॉप इथाइल यांसारखी प्रभावी रसायने वापरावी. फवारणीसाठी सिलिकॉन स्टिकर वापरल्यास परिणामकारकता वाढते.
फवारणी आणि देखभाल कधी करावी?
नर्सरी अवस्थेत, बी पेरल्यानंतर 24 ते 48 तासांत पहिली फवारणी करावी. पुनर्लागवडीनंतर 40 ते 60 दिवसांत दुसरी खुरपणी करावी. चिलेटेड झिंकचा वापर केल्यास पिकाच्या मूळ भागावर तणनाशकांचा दुष्परिणाम कमी होतो.
Mumbai,Maharashtra
June 25, 2025 12:46 PM IST
शेतात उगवणाऱ्या काँग्रेस, लव्हाळा गवताची कटकट कायमची मिटवा! हा प्रयोग नक्की करा