By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: कृषी हवामान : 4,5,6 जुलैला पावसाचा जोर वाढणार, नद्या नाले ओसंडून वाहणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > कृषी हवामान : 4,5,6 जुलैला पावसाचा जोर वाढणार, नद्या नाले ओसंडून वाहणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
टॉप स्टोरीज़

कृषी हवामान : 4,5,6 जुलैला पावसाचा जोर वाढणार, नद्या नाले ओसंडून वाहणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

News Desk
Last updated: 2025/07/04 at 3:36 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:July 04, 2025 8:58 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या मान्सूनचा प्रभाव काही भागांत मर्यादित राहिला असला तरी पुढील काही तासांत काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

agriculture news

 मुंबई: राज्यात सध्या मान्सूनचा प्रभाव काही भागांत मर्यादित राहिला असला तरी पुढील काही तासांत काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 4 जुलै रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागात कोरडे अथवा ढगाळ हवामान राहणार असले तरी कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सह्याद्री घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोल्हापूरच्या घाट भागात आणि सिंधुदुर्गात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार

हवामान विभागाच्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे आणि पालघर या किनारी जिल्ह्यांत पुढील काही तासांत जोरदार पाऊस पडू शकतो. यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत गुरुवारी दिवसभर आकाश ढगाळ राहील, कधीकधी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उपनगरांमध्येही काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ या भागांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळू शकतात.

उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी

राज्याच्या पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 4 जुलै रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र या भागात ताशी जोरदार पावसाचा धोका फारसा नाही. विदर्भातही दिवसभर ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाचा जोर तुलनेने कमी राहील. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, 5 जुलैपासून पावसाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होईल. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत 5 जुलैपासून जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी, नागरिक व स्थानिक प्रशासनाने यासाठी आधीपासूनच आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

5 आणि 6 जुलै या दोन दिवसांत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता असून, नद्या व नाले तुडुंब भरू शकतात. त्यामुळे सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे व पुराची शक्यता लक्षात घेऊन योग्य ती काळजी घ्यावी.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 04, 2025 8:58 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

कृषी हवामान : 4,5,6 जुलैला पावसाचा जोर वाढणार, नद्या नाले ओसंडून वाहणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, Maharashtra weather news, marathi agriculture news, monsoon 2025, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article केमिकल फंड, अनुदानित पोर्ट क्लस्टरला चीनकडून आयातीवरील अवलंबन कमी करण्याची आवश्यकता आहे: टीएएनए पासून आयातीवरील अवलंबन कमी करण्यासाठी एनआयटीआय आयगला रासायनिक फंड सबसिडी पोर्ट क्लस्टरची आवश्यकता आहे
Next Article Agriculture News : सरकारचा ‘गाव तिथे हवामान केंद्र’ प्रकल्प काय आहे? शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा सविस्तर
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : पावसाळ्यात शेतातील शंख गोगलगायचा प्रभाव कसा कमी करायचा? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांनो! फक्त 50,000 रुपयांत सुरू करा व्यवसाय, आयुष्यभर कराल लाखांत कमाई
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
Success Story: नोकरीत काय आहे? उच्चशिक्षित तरुणाने घेतल्या 10 गायी, आता कमतोय पैसाच पैसा! Video
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
Pik Vima: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, फळपीक विमा काढण्याची शेवटची संधी, उरले फक्त 2 दिवस!
टॉप स्टोरीज़ July 4, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?