By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: कृषी हवामान : आठवड्याच्या सूरवातीलाच पावसाचा धुमाकूळ, पुढील 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना अलर्ट जाहीर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > कृषी हवामान : आठवड्याच्या सूरवातीलाच पावसाचा धुमाकूळ, पुढील 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना अलर्ट जाहीर
टॉप स्टोरीज़

कृषी हवामान : आठवड्याच्या सूरवातीलाच पावसाचा धुमाकूळ, पुढील 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना अलर्ट जाहीर

News Desk
Last updated: 2025/07/07 at 3:51 AM
News Desk
Share
2 Min Read

कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव

पश्चिम बंगाल आणि आसपासच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाच्या सरी वाढू लागल्या आहेत. रविवारी (6 जुलै) तयार झालेली प्रणाली पुढील 24 तासांत झारखंड आणि छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत जाणवतो आहे. दक्षिण गुजरात आणि दक्षिण कर्नाटकच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे दमदार पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस

रविवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत कोकण आणि घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखेडा येथे सर्वाधिक 190 मिमी पाऊस पडला. तसेच, कोकणातील इतर भागांमध्ये 100 मिमीपेक्षा जास्त पावसाच्या सरी कोसळल्या. या भागांतील नद्या आणि ओढ्यांना पूर येण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

आज (7 जुलै) रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा तसेच विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून नदीकाठच्या गावांना धोका वाढण्याची चिन्हे आहेत.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट

तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, यवतमाळ, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींसह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी हवामान विभागाने वाऱ्याचा वेग वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे.

रविवारी (6 जुलै) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील उच्चांकी 32.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाचा जोर असला तरी काही जिल्ह्यांत उष्णतेची तीव्रता टिकून राहिली आहे.

राज्यातील कृषी, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नद्यांच्या पाणी पातळ्यांवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदीकिनाऱ्यांपासून सुरक्षित अंतर राखावे, तसेच विजांच्या गडगडाटाच्या वेळी उघड्यावर न राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 07, 2025 8:34 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

कृषी हवामान : आठवड्याच्या सूरवातीलाच पावसाचा धुमाकूळ,पुढील 24 तास धोक्याचे,या जिल्ह्यांना अलर्ट जाहीर

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, monsoon 2025, weather update, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article ओएनजीसीसह ऑइल डिस्कवरी ग्लोबल लीजेंडरी कंपन्या – ग्लोबल ऑइल जायंट्स आयएएएल इंडिया ओल्प फेरी 10 ओएनजीसी रिलायन्स बीपी पेट्रोब्रास स्पष्टीकरण भागीदारी
Next Article व्यापार युद्ध: अंबानीची अमेरिका-चीन व्यापार युद्धात प्रवेश! आता भारताला यापूर्वी चीनला जाण्याचा गॅस मिळत आहे – ट्रेड वॉर अमेरिका चिनास एन्टो चीन व्यापार युद्ध आता भारताचे आदेश मिळवत आहे
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : लागवड, पेरणी झाली आता तणव्यवस्थापन कसं करायचे? वाचा पीकनिहाय सल्ला
टॉप स्टोरीज़ July 7, 2025
Agriculture News : शेतजमिनीचे सीमांकन कसं करायचे? त्याचे फायदे, अर्जप्रक्रिया वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ July 7, 2025
Agriculture News : शेजाऱ्याने तुमची जमीन हडपलीये का? मालकी हक्क देण्यास नकार, मग ‘हा’ पर्याय वापराच
टॉप स्टोरीज़ July 7, 2025
ब्रिक्स समिट रिओ: ब्रिक्स समिटमध्ये पंतप्रधान मोदींनी काय म्हटले होते की जगाने खूप काळजीपूर्वक ऐकले- ब्रिक्स समिटमध्ये पंतप्रधान मोदी काय म्हणाले
Business July 7, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?