By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : MahaDBT योजनांसाठी कृषी विभागाचा मोठा निर्णय! 7/12 , 8 अ उताऱ्याची गरज लागणार नाही
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : MahaDBT योजनांसाठी कृषी विभागाचा मोठा निर्णय! 7/12 , 8 अ उताऱ्याची गरज लागणार नाही
टॉप स्टोरीज़

Agriculture News : MahaDBT योजनांसाठी कृषी विभागाचा मोठा निर्णय! 7/12 , 8 अ उताऱ्याची गरज लागणार नाही

News Desk
Last updated: 2025/07/14 at 11:13 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:July 14, 2025 11:42 AM IST

Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. कृषी विभागाच्या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना सातबारा आणि 8 अ उतारा अपलोड करण्याची आवश्यकता नाही, असा स्पष्ट आदेश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिला आहे.

News18

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. कृषी विभागाच्या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना सातबारा आणि 8 अ उतारा अपलोड करण्याची आवश्यकता नाही, असा स्पष्ट आदेश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिला आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी व जलद होणार असून, शेतकऱ्यांच्या अर्जांवर होणाऱ्या त्रुटींचाही मोठ्या प्रमाणात अडथळा दूर होणार आहे.

शेतकऱ्यांना ‘अ‍ॅग्रिस्टॅक’ क्रमांकामुळे मिळणार थेट लाभ

शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती आता अ‍ॅग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांकाच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टलवर भरण्यात येते. त्यामुळे त्यांचा जमीनधारक तपशील, आधार क्रमांक, खाते क्रमांक, जमिनीची माहिती यांसह सर्व आवश्यक डेटा एकाच ठिकाणी उपलब्ध होतो. परिणामी, शेतकऱ्यांना वेगळे कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता उरत नाही.

काही ठिकाणी चुकीची अंमलबजावणी

राज्यातील काही तालुक्यांमध्ये स्थानिक कृषी अधिकाऱ्यांनी सातबारा आणि 8 अ उतारे अपलोड न केल्यामुळे काही शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले होते. विशेष म्हणजे, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार लाभ दिला जात असल्यामुळे हे अर्ज मागे फाटण्याची शक्यता होती. मात्र, या बाबत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर कृषी आयुक्तांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश

कृषी विभागाकडून सर्व सहायक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की शेतकऱ्यांकडून सातबारा किंवा ८ अ उताऱ्याची मागणी करू नये. अ‍ॅग्रिस्टॅक क्रमांकाच्या आधारे अर्ज तपासला जावा आणि आवश्यक ती कार्यवाही तत्परतेने पूर्ण करावी.

अशी आहे सुधारित अर्ज प्रक्रिया

शेतकरी अ‍ॅग्रिस्टॅक क्रमांक घेऊन महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करतो. अर्जात आवश्यक प्राथमिक माहिती भरतो.काही आवश्यक कागदपत्रे (जसे आधार, खाते तपशील) अपलोड करतो. सहायक कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी अर्जाची छाननी करतात.

लाभार्थी निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर होते.

केंद्र सरकारचा अ‍ॅग्रिस्टॅक प्रकल्प देशपातळीवर सुरू

या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारनेही देशभरातील शेतकऱ्यांसाठी ‘अ‍ॅग्रिस्टॅक’ प्रकल्प हाती घेतला आहे, ज्यासाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची एकात्मिक डिजिटल ओळख तयार करून, देशभरातील योजनांमध्ये पारदर्शकता आणि जलद कार्यवाही सुनिश्चित केली जात आहे.

दरम्यान, राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी असून, अर्ज प्रक्रिया आता अधिक सुलभ, वेगवान आणि त्रुटीमुक्त होणार आहे. सातबारा, 8 अ उताऱ्याची गरज नसेल तर शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत. त्यामुळे शेतकरी अधिक मोठ्या प्रमाणात कृषी योजनांचा लाभ घेऊ शकतील.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 14, 2025 11:42 AM IST

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, mahadbt, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Property Rules : घर, प्रॉपर्टी खरेदी करताना हे कागदपत्रे बंधनकारक! अन्यथा होणार कायदेशीर कारवाई
Next Article टाटा टेक्नॉलॉजीज क्यू 1 निकालः पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा ₹ 170 कोटी आहे, परंतु महसूल 2%कमी झाला आहे- टाटा टेक्नॉलॉजीज क्यू 1 एफवाय 26 नफा कमाई अप रेव्हेन्यू डाऊन डील्स सीईओ आउटलुक
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : अमेरिकेच्या करारामुळे महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट!
टॉप स्टोरीज़ July 15, 2025
Farmer Success Story: फिरण्यासाठी गेले, नजरेस पडली ड्रॅगन फ्रूटची शेती, शेतकरी आता कमतोय 10 लाखांचं निव्वळ उत्पन्न, Video
टॉप स्टोरीज़ July 15, 2025
एचडीएफसी लाइफ क्यू 1 निकालः वित्तीय वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीत 6 546 कोटी, एकूण प्रीमियम उत्पन्न ₹ 2500 कोटींपेक्षा जास्त – एचडीएफसी लाइफ क्यू 1 निकाल एफवाय 26 निव्वळ नफा तांका ते 14 टक्के 546 कोटी रुपये
Business July 15, 2025
Farmer Scheme: शेतकऱ्यांना मिळणार मोठं बक्षीस! 11 पिकांसाठी खास स्पर्धा, लगेच करा अर्ज, पात्रता काय?
टॉप स्टोरीज़ July 15, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?