By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्‍यांचा मोठा निर्णय! तातडीने दिले हे आदेश
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्‍यांचा मोठा निर्णय! तातडीने दिले हे आदेश
टॉप स्टोरीज़

Agriculture News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्‍यांचा मोठा निर्णय! तातडीने दिले हे आदेश

News Desk
Last updated: 2025/05/28 at 9:58 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:May 28, 2025 2:54 PM IST

Agriculture News : राज्यात मागील आठवड्याभरात झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे अनेक भागांत शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अति पावसामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे.

News18

मुंबई : राज्यात मागील आठवड्याभरात झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे अनेक भागांत शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अति पावसामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागांतील पंचनामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

34 हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान

राज्य सरकारकडून प्राप्त आकडेवारीनुसार, रविवारी (25 मे) पर्यंत राज्यात सुमारे 34 हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. खरिप हंगाम सुरू होण्याच्या उंबरठ्यावरच अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकरी नेत्यांनी “पंचनाम्यांची प्रतीक्षा न करता तात्काळ आर्थिक मदत द्यावी,” अशी मागणी सरकारकडे केली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

मंगळवारी (27 मे) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसाचा एकूण आढावा, पिकांचे नुकसान, धरणातील साठा, आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची तयारी यावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सांगितले की, ‘सचेत’ प्रणालीद्वारे 19 कोटींहून अधिक सतर्कतेचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवले गेले आहेत.

तांत्रिक तयारी आणि आपत्कालीन यंत्रणा सक्रिय

सेठी यांनी ही माहिती देखील दिली की राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात अत्याधुनिक संवाद व विश्लेषण प्रणाली कार्यरत आहे. नागपूर आणि धुळे येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथके तैनात करण्यात आली असून, नांदेड आणि गडचिरोली येथेही हालचाली सुरू आहेत.

मृत्यू आणि जखमींची माहिती

पावसामुळे राज्यात विविध दुर्घटनांमध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. वीज पडणे, झाडे कोसळणे, भिंती कोसळणे, आणि पाण्यात बुडणे अशा घटनांमुळे हे अपघात घडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या मृतांच्या कुटुंबियांना नियमांनुसार तातडीची आर्थिक मदत देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! तातडीने दिले हे आदेश

TAGGED: agriculture, agriculture latest news, agriculture news, farmer, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article मायक्रोफायनान्समध्ये मोठ्या पुनरागमनाची तयारी, कोटक यांनी स्वस्त मूल्यांकनासह 3 समभागांना सांगितले जे मजबूत कमाई करू शकेल! – कमबॅक कोटकसाठी मायक्रोफायनान्स सेक्टर सेट स्मार्ट गुंतवणूकदारांसाठी या 3 समभागांची शिफारस करतो
Next Article खरीफ पिकांसाठी एमएसपी: एमएसपीने खरीफ पिकांसाठी घोषित केले, बाजरीवर जास्तीत जास्त नफा, परंतु पावसाळा एक आव्हान बनू शकतो – एमएसपीने खरीफ २०२25 साठी उभे केले २ Ba बजरा अव्वल नफा यादी
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Kharif Season: शेतकऱ्यांनो, टोकन यंत्राचा वापर करून केलेली पेरणी वरदान, कोणकोणते होतात फायदे माहितीये का?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Agriculture News : PM Kisan च्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार? समोर आली महत्वाची अपडेट
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
एडीए टोटल गॅस आणि जिओ -बीपी भागीदारी, आता आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी मिळेल – अदानी टोटल गॅस आणि जिओ बीपी समान इंधन स्थानकांवर पेट्रोल डिझेल आणि सीएनजी ऑफर करण्यासाठी
Business June 25, 2025
Agriculture News : तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?