Last Updated:
सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. पावसामुळे 2 एकरातील कांदा खराब झाला असून शेतकरी सतीश रामलिंग शिंदे यांचे 3 ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील नारी गावातील शेतकरी सतीश रामलिंग शिंदे यांनी दोन एकरात कांद्याची लागवड केली होती. पण या अवकाळी पावसामुळे 2 एकरातील कांदा खराब झाला असून शेतकरी सतीश रामलिंग शिंदे यांचे 3 ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे.
बार्शी तालुक्यातील नारी गावातील शेतकरी सतीश शिंदे यांनी दोन एकरात कांद्याची लागवड केली होती. सोलापुरात उन्हाची तीव्रता 45 डिग्री असताना सुद्धा योग्य त्या प्रकारे नियोजन करून कांद्याची लागवड केली होती. तर 2 एकरात कांद्याची लागवड करण्यासाठी 2 लाख 40 हजार रुपये पर्यंत खर्च आला होता. पण अचानक बदललेल्या वातावरणामुळे काढणीच्या प्रतीक्षेत असलेला उभा कांदा आणि साठवलेला कांदा अवकाळी पावसामुळे खराब झाला आहे.
तर या अवकाळी पावसामुळे शेतकरी सतीश रामलिंग शिंदे यांचे जवळपास 3 ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा माझ्याकडे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी सतीश शिंदे यांनी सांगितले.
चिमुकलीने केली सरकारकडे विनंती
अवकाळी पावसामुळे आमच्या कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा विकून माझे वडील मला शाळेला जाण्यासाठी नवीन सायकल, दप्तर, शाळेला जाण्यासाठी गणवेश घेणार होते. परंतु अवकाळी पावसामुळे आमच्या कांद्याचे संपूर्ण नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी, अशी विनंती चौथीमध्ये शिक्षण घेणारी चिमुकली सायली शिंदे हीने केली आहे.
Solapur,Maharashtra
Onion Crop: ‘पप्पाकडे दप्तर, शालेय गणवेश घेण्यासाठी पैसे नाहीत’, शेतकऱ्याचा मुलांनी मांडली काळीज धस्स करणारी व्यथा Video