राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान
या योजनेंतर्गत धान्य उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खत, औषधे, कृषी यंत्रे यावर अनुदान दिले जाते. खास करून गहू, तांदूळ, डाळी आणि तेलबियांसाठी ही योजना उपयुक्त आहे. पंचायत समिती मार्फत अर्ज स्वीकारले जातात आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते.
मशागती साहित्य आणि कृषी यंत्रे अनुदान योजना
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, कापणी मशीन, स्प्रे पंप अशा यंत्रांवर 50% ते 50% पर्यंत अनुदान मिळते. पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधून या योजनांचा लाभ घेता येतो. ही योजना लघु व सीमान्त शेतकऱ्यांना विशेष लाभदायक आहे.
सूक्ष्म सिंचन योजना
पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतात ठिबक व तुषार सिंचन पद्धतीसाठी सरकारकडून 70% पर्यंत अनुदान दिले जाते.पंचायत समिती स्तरावर ठिबक सिंचन विक्रेत्यांची यादी व फॉर्म उपलब्ध असतो. या योजनेमुळे जलसंधारणासोबतच उत्पादन वाढीसही मदत होते.
पशुधन विकास योजना
गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या, कुक्कुटपालनासाठी अनुदानित योजना उपलब्ध आहेत. पंचायत समितीमार्फत जनावरांच्या आरोग्यासाठी लसीकरण, तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. दुग्ध व्यवसायासाठी शीतकरण केंद्रांसाठी देखील सहाय्य दिले जाते.
माती परीक्षण आणि सेंद्रिय शेती अभियान
पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत माती परीक्षण मोहीम राबवली जाते. याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीत आवश्यक असलेली अन्नद्रव्यांची माहिती मिळते.तसेच सेंद्रिय शेतीसाठी कंपोस्ट खते,गांडूळ खत यावर अनुदान दिले जाते.
शेतकरी प्रशिक्षण व प्रवास योजना
शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, नवीन तंत्रज्ञान, मार्केटिंग यासंबंधी प्रशिक्षण दिले जाते. काही वेळा शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांत किंवा राज्यांबाहेर शेती दौऱ्यांनाही पाठवले जाते. यासाठी अर्ज पंचायत समितीकडे सादर करावा लागतो.
योजना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
7/12 उतारा
आधार कार्ड
बँक पासबुक
पिकाची माहिती
ओळखपत्र / शेतकरी कार्ड
Mumbai,Maharashtra
June 25, 2025 1:35 PM IST
बियाणांपासून ते ट्रॅक्टरपर्यंत! पंचायत समितीकडून घ्या विविध योजनांचा लाभ, असा करा अर्ज