By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : सोयाबीनचे पीक नको रे बाबा! शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, लाखो हेक्टर क्षेत्र घटणार, नेमकं कारण काय? वाचा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : सोयाबीनचे पीक नको रे बाबा! शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, लाखो हेक्टर क्षेत्र घटणार, नेमकं कारण काय? वाचा
टॉप स्टोरीज़

Agriculture News : सोयाबीनचे पीक नको रे बाबा! शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, लाखो हेक्टर क्षेत्र घटणार, नेमकं कारण काय? वाचा

News Desk
Last updated: 2025/07/01 at 6:22 AM
News Desk
Share
3 Min Read

मुंबई : केंद्र सरकारने सोयाबीनच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) वाढ जाहीर केली असली, तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा या पिकाकडे ओढा कमी झाल्याचे चित्र आहे. मागील वर्षी हमीभावापेक्षा लक्षणीय प्रमाणात कमी बाजारभाव मिळाल्यामुळे आणि दरांमध्ये सातत्याने असलेल्या अस्थिरतेमुळे उत्पादकांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. परिणामी, या खरीप हंगामात राज्यात सोयाबीनच्या लागवडीचे क्षेत्र सुमारे दोन लाख हेक्टरने घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांना मोठा फटका

गेल्या हंगामात सरकारने सोयाबीनसाठी 4,892 रुपये प्रतिक्विटल हमीभाव जाहीर केला होता. मात्र प्रत्यक्ष बाजारात शेतकऱ्यांना फक्त 3,800 ते 3,950 रुपये दर मिळाला. केंद्र सरकारने हमीभावाने खरेदी करण्याची संपूर्ण क्षमता नसल्याची माहिती व्यापाऱ्यांना असल्याने, बाजारात संगनमताने दर पाडले गेले, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. या परिस्थितीचा मोठा आर्थिक फटका मराठवाडा आणि विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना बसला.

या पार्श्वभूमीवर 2025-26 हंगामासाठी केंद्र सरकारने हमीभावात प्रतिक्विटल 436 रुपयांची वाढ करत तो 5,328 रुपये केला आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यात या निर्णयाला फारसा यश मिळालेले दिसत नाही.

शेतकऱ्यांसमोर पर्याय काय?

मराठवाड्यात सोयाबीन हे मुख्य आर्थिक पीक मानले जाते, अगदी पश्चिम महाराष्ट्रासाठी ऊस जितका महत्त्वाचा आहे, तितकेच मराठवाड्यासाठी सोयाबीन. मात्र केंद्र सरकारच्या खाद्यतेल व सोयाबीन आयात-निर्यात धोरणातील अस्थिरतेमुळे देशांतर्गत बाजारात हमीभावाचा आधार टिकत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी सोयाबीनऐवजी इतर पिकांची लागवड करण्याचा विचार करत आहेत.

दरम्यान, राज्यातील खरीप हंगामाची व्यापक तयारी सुरू आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, या वर्षी एकूण 144.97 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आवश्यक बियाण्यांचा साठा 19.14 लाख क्विंटल इतका असताना, प्रत्यक्ष उपलब्ध बियाणे 25.08 लाख क्विंटल इतके आहे. त्याचप्रमाणे 46.82 लाख मेट्रिक टन खताची आवश्यकता असून, 25.57 लाख मेट्रिक टन खत सध्या उपलब्ध आहे.

मात्र एवढी तयारी असूनही बाजारभावातील अनिश्चितता शेतकऱ्यांच्या निर्णयावर परिणाम करत आहे. हमीभाव आणि प्रत्यक्ष बाजारभावातील मोठा फरक दूर होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची नाराजी संपण्याची शक्यता कमी आहे. या परिस्थितीचा राज्याच्या एकूण तेलबिया उत्पादनावरही परिणाम होणार आहे.

एकूण परिस्थिती काय?

मागील हंगामातील पेरणी क्षेत्र: 51.36 लाख हेक्टर

चालू हंगामातील संभाव्य पेरणी क्षेत्र: 48.65 लाख हेक्टर

अंदाजित घट: सुमारे 2 लाख हेक्टर

नवीन हमीभाव (2025-26): 5,328 रुपये प्रतिक्विटल

मागील वर्षी प्रत्यक्ष मिळालेला बाजारभाव:3,800–3,950 रुपये प्रतिक्विटल

राज्यातील शेतकऱ्यांनी यंदा दरांच्या अनिश्चिततेमुळे सोयाबीनऐवजी कापूस, तूर किंवा अन्य पिकांकडे वळण्याचा कल दाखवला आहे. यावर सरकारने तातडीने उपाययोजना करून बाजारव्यवस्थेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 01, 2025 11:22 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

सोयाबीनचे पीक नको रे बाबा! शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, लाखो हेक्टर क्षेत्र घटणार

TAGGED: agriculture, agriculture news, latest agriculture news farmer, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Property Rules : एक गुंठा जमिनीचे विभाजन करता येते का? नियम, कायदा काय सांगतो?
Next Article Agriculture News : घरबसल्या शेतजमिनीवर वारसाची नोंद कशी करायची? अर्जप्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : 2 लाख रु किलोने विकले जाणाऱ्या मशरूमची शेती! त्याचे प्रकार कोणते? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ July 2, 2025
Agriculture News : PM Kisan ला लिंक असलेला मोबाईल नंबर बंद झालाय का? या पद्धतीने करा अपडेट, अन्यथा हप्ता अडकणार
टॉप स्टोरीज़ July 2, 2025
ओला-ल्युबर राइड आता खिशात भारी! भाडे 2 पट पुनर्प्राप्त करण्यासाठी सरकारने 2 वेळा सूट दिली
Business July 2, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना अंगावर वीज कोसळण्यापूर्वी तातडीची सूचना मिळणार! नवीन अॅप कसं असणार? मंत्री महाजनांनी सविस्तर सांगितलं
टॉप स्टोरीज़ July 2, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?