01
शेतकऱ्यांना एक नव्हे, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हवामानाचा मार सहन करण्यापासून ते शेतातून धान्य घरी आणणे, ते सुरक्षित ठेवणे आणि बाजारात नेणे शेतकऱ्यांसाठी सोपे नसते. यात शेतकऱ्यांचे पैसे, वेळ आणि मेहनत खर्च होते. मात्र, अनेकदा खूप मेहनत करूनही एका छोट्या चुकीमुळे धान्य खराब होते.