कमी दाबाचा पट्टा सक्रिय
बंगालच्या उपसागरात ओडिशा किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ही प्रणाली उत्तरेकडे सरकत अधिक तीव्र होणार आहे. विदर्भ आणि छत्तीसगड परिसरावर चक्राकार वारे सक्रिय आहेत. तसेच छत्तीसगडपासून आग्नेय राजस्थानपर्यंत हवामानात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, त्यामुळे राज्यात विविध भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे.
घाटमाथ्यावर पावसाचा कहर
मंगळवारी (26 मे) सकाळपर्यंत मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र व पश्चिम घाट भागातही जोरदार पावसाच्या सरी पडल्या. रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे तब्बल 280 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
रेड अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
येलो अलर्ट
मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर , हिंगोली, नांदेड नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा
मॉन्सूनची वाटचाल थांबली, पण स्थिती अनुकूल
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी (26 मे) मुंबई, पुणे, सोलापूर, धाराशिवपर्यंत वाटचाल केली होती. मात्र, मंगळवारी (28 मे) मॉन्सूनची प्रगती थांबली. तरीही अनुकूल हवामानामुळे पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राचा उर्वरित भाग, तसेच कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि सिक्कीम–पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागांमध्ये मॉन्सून पोहोचण्याची शक्यता आहे.
Mumbai,Maharashtra
येत्या 24 तासांत पाऊस शेतकऱ्यांची पुन्हा उडवणार दाणादाण! या 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट