Last Updated:
Agriculture News : पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळत आहेत. कमी क्षेत्रात, तुलनेने कमी मेहनतीत आणि कमी पाण्यावरही भरघोस उत्पन्न देणारे हे पीक आता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग ठरत आहे.
मुंबई : पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळत आहेत. कमी क्षेत्रात, तुलनेने कमी मेहनतीत आणि कमी पाण्यावरही भरघोस उत्पन्न देणारे हे पीक आता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग ठरत आहे. अशातच आता सिंदूर शेतीतून शेतकरी दरवर्षी लाखो रुपयांचा नफा कमवत असून ही शेती आता हाई व्हॅल्यू क्रॉप म्हणून गणली जात आहे.
सिंदूर म्हणजे काय?
सिंदूर हे “बिक्सा ओरेल्याना” या वनस्पतीपासून मिळते. या वनस्पतीचे फळ गडद तांबड्या रंगाचे असून त्यातील बिया प्रक्रियेनंतर सिंदूर (Annatto) तयार होते. याचा वापर प्रामुख्याने अन्नप्रक्रिया उद्योगात नैसर्गिक रंग म्हणून केला जातो. तसेच सौंदर्यप्रसाधने, औषधे, तसेच धार्मिक कार्यातही याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे याच्या बाजारभावाला कायमच मागणी असते.
कमी खर्च, जास्त उत्पन्न
सिंदूर पिकाची लागवड मुख्यतः जून ते ऑगस्ट दरम्यान केली जाते. याचे रोपे सहसा 4-5 रुपये प्रति युनिट दराने मिळतात. एक एकर क्षेत्रात सरासरी 300-450 झाडे लावली जातात. रोपांची लागवड केल्यानंतर दोन वर्षांत झाडे फळधारणा करतात, आणि त्यानंतर सात ते आठ वर्षे सतत उत्पादन देतात.
एका झाडापासून सरासरी 1.5 ते 2 किलो बिया मिळतात. बियांचा सध्याचा बाजारभाव 400 ते 600 प्रति किलो दरम्यान आहे. म्हणजेच, एका एकरातून वर्षाला 2 ते 3 लाख रुपयांचे उत्पन्न सहज शक्य आहे.
हवामान व जमीन
सिंदूर पीक उष्ण व दमट हवामानात चांगले वाढते. यासाठी मध्यम ते हलकी कसदार जमीन योग्य असते. सिंचनाची जास्त गरज नसल्याने कोरडवाहू भागातही याचे उत्पादन शक्य होते. कीड रोगांचाही प्रादुर्भाव तुलनेत कमी असल्यामुळे खर्चही कमी येतो.
Mumbai,Maharashtra
June 11, 2025 11:54 AM IST
खत औषधांचे टेन्शन नाही! 400 झाडं लावा, 600 रु किलो भाव, वर्षाला कराल लाखोंची कमाई