By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : उन्हाळ्यात भाजीपाला पिकाचे नियोजन कसं करायचे? वाचा सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : उन्हाळ्यात भाजीपाला पिकाचे नियोजन कसं करायचे? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़

Agriculture News : उन्हाळ्यात भाजीपाला पिकाचे नियोजन कसं करायचे? वाचा सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/08 at 11:34 PM
News Desk
Share
3 Min Read

Contents
कोणती काळजी घ्यावी?भेंडी आणि गवारवेलवर्गीय भाज्यावेलींना आधार देण्यासाठी योग्य उपायमिरची, वांगी आणि टोमॅटोकोथिंबीरपालेभाज्यांचे महत्त्व
News18

मुंबई: महाराष्ट्रातील उन्हाळी हंगामात विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मुख्यतः कलिंगड, खरबूज, काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, तोंडली, तांबडा भोपळा, भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, चवळी, घेवडा, कोथिंबीर, कांदापात, मेथी, राजगिरा, माठ आणि पोकळा यांचा समावेश होतो. या हंगामातील भाजीपाला लागवडीबाबत योग्य नियोजन आणि काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

कोणती काळजी घ्यावी?

लागवडीसाठी सेंद्रिय घटकांनी समृद्ध आणि पाण्याचे चांगले निचरायुक्त जमीन निवडावी. तसेच जमिनीवर आच्छादनाचा वापर करून आर्द्रता टिकवावी. गरम वाऱ्यांपासून बचावासाठी शेताच्या कडेला उंच वाढणारी झाडे किंवा मक्याच्या दाट झाडी लावाव्यात. कीड आणि रोगप्रतिकारक जाती निवडून योग्य प्रमाणात सिंचन आणि खत व्यवस्थापन करावे.फळांची तोडणी शक्यतो संध्याकाळी करावी आणि स्वच्छ ठिकाणी त्याचे प्रतवारीकरण, पॅकिंग व साठवणूक करावी. मालवाहतूक पहाटेच्या वेळी करणे फायदेशीर ठरेल.

भेंडी आणि गवार

उन्हाळी हंगामात भेंडी व गवार यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. भेंडीच्या लागवडीसाठी परभणी क्रांती, अर्क अनामिका, पुसा सवानी आणि पंजाब पद्मनी ही वाणे उपयुक्त ठरतात. गवारीसाठी पुसा सदाबहार व पुसा नवबहार या जाती उत्पादनक्षम मानल्या जातात. योग्य सिंचन व्यवस्थापन आणि संध्याकाळी (साधारण 5 नंतर) तोडणी केल्यास चांगल्या प्रतीचा माल मिळतो.

वेलवर्गीय भाज्या

काकडी, कारली, दुधी भोपळा, दोडका आणि घोसाळी या पिकांची बियाण्याद्वारे रुंद अंतरावर लागवड केली जाते. बिया उगवल्यानंतर वेलीला आधार देणे गरजेचे असते. उत्तम उत्पादनासाठी मंडप किंवा ताटी पद्धतीचा अवलंब करावा. कमकुवत वेलींना आधार दिल्यास त्यांची वाढ अधिक होते.

वेलींना आधार देण्यासाठी योग्य उपाय

मंडप किंवा ताटी पद्धतीमुळे फळे जमिनीपासून उंच राहतात आणि त्यांची गुणवत्ता सुधारते.

चांगला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे फळांचा रंग आकर्षक राहतो.

फवारणी आणि तोडणी अधिक सोयीस्कर होते.

मंडप पद्धतीमुळे दुधी भोपळ्याच्या उत्पादनात 2.5 ते 3 पट वाढ होऊ शकते.

मिरची, वांगी आणि टोमॅटो

या पिकांची रोपे गादी वाफ्यावर तयार करावी. डिसेंबर-जानेवारीत बियाणे पेरल्यास जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान रोपांची लागवड करता येते. मिरचीच्या लागवडीसाठी उंच वाढणाऱ्या व भरपूर फांद्या असणाऱ्या जाती निवडाव्यात. मिरचीची झाडे झुपक्यात येणाऱ्या फुलांनी युक्त असावीत.

कोथिंबीर

कोथिंबिरीला कोरडे हवामान पोषक ठरते. उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर हे पीक चांगले उत्पादन देते. वाफे तयार करून आठवड्याच्या अंतराने लागवड करावी.

पालेभाज्यांचे महत्त्व

उन्हाळी हंगामात राजगिरा, पोकळा, माठ आणि मेथी यांसारख्या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या भाज्या सहज उपलब्ध असून पोषणमूल्यांनी युक्त असतात. बाजारपेठ जवळ असल्यास व योग्य वाहतूक सुविधा असल्यास शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळतो. पालेभाज्यांसाठी नियमित पाण्याचा पुरवठा आणि योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

April 12, 2025 10:47 AM IST

TAGGED: agriculture news, farmer, latest agriculture news, vegetable farming, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article पुढील आठवड्यात जिओ क्रेडिट 1,000 कोटी रुपयांचे बॉन्ड रिलीज करेल – पुढील आठवड्यात जिओ क्रेडिट जारी करण्यासाठी 1000 कोटी रुपये जारी करा
Next Article आंध्र प्रदेशात एलजीची 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक, नवीन प्लांट रोजगाराचे एक प्रमुख केंद्र बनेल – आंध्र प्रदेशात 5000 कोटी रुपयांची एलजी गुंतवणूक ही रोजगाराचे प्रमुख केंद्र बनेल.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांना बियाणे, खतांविषयी अडचणी असल्यास कृषी विभागाकडे कशी तक्रार करायची?
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मॉन्सून महाराष्ट्रात येणार
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?