Last Updated:
PM Gharkul Yojana : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरजू आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरकुल आवास योजना (Gharkul Yojana) गेल्या काही वर्षांपासून प्रभावीपणे राबवली जात आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरजू आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरकुल आवास योजना (Gharkul Yojana) गेल्या काही वर्षांपासून प्रभावीपणे राबवली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत राज्यातील अनेक शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या योजनेचा थेट लाभ मिळत आहे. या योजनेत लाभार्थ्यांना सुलभ दरात, टप्प्याटप्प्याने अनुदान स्वरूपात आर्थिक मदत देऊन घरे बांधून देण्यात येतात.
परंतु, अनेकांना आजही हे माहीत नाही की आपण या योजनेचे लाभार्थी आहोत की नाही. त्यामुळेच या बातमीत घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे की नाही? हे ऑनलाइन कसं तपासायचं? याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
घरकुल योजनेतील तुमचं नाव ऑनलाइन कसं तपासाल?
सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर pmayg.nic.in किंवा pmayj.nic.in असे टाईप करून सर्च करा. नंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण वेबसाइट उघडा तुम्हाला “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण” नावाची अधिकृत वेबसाइट दिसेल. त्या पेजवर “AwaasSoft” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ‘रिपोर्ट’ नावाच्या सेक्शनमध्ये जात Social Audit Report निवडा. नंतर पुढील पेजवर तुम्हाला “Social Audit Reports” असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पुढे जाऊन आता “Beneficiary Details For Verification” या पर्यायावर क्लिक करा.एक नवीन MIS Report विंडो उघडेल. या पेजवर खालील माहिती भरावी लागेल. जसे की, राज्य (महाराष्ट्र),जिल्हा, तालुका, गाव, योजना वर्ष, योजना प्रकार (उदा. PMAY-G) निवडा. नंतर दिलेला सुरक्षा कोड (Captcha) अचूकपणे भरून ‘Submit’ किंवा ‘Get Report’ बटणावर क्लिक करा. आता तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल. या यादीत तुमचं नाव शोधा.
या यादीत खालील गोष्टींची माहिती मिळेल. जसे की,लाभार्थ्याचं नाव,घर मंजुरीचा क्रमांक, सध्याची बांधकाम स्थिती (उदा.पहिला टप्पा, दुसरा टप्पा, पूर्ण झालं इत्यादी)
योजनेचा लाभ का महत्त्वाचा?
घरकुल योजनेचा उद्देश म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचं घर मिळवून देणे. विशेषतः ग्रामीण भागात घरे नसलेल्या किंवा अपूर्ण घरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. योजनेअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये आर्थिक मदत दिली जाते आणि केंद्र सरकार, राज्य सरकार व ग्रामपंचायती यांच्या सहकार्याने हे काम पार पाडले जाते.
Mumbai,Maharashtra
June 19, 2025 12:14 PM IST
शेतकऱ्यांनो! तुमचं नाव घरकुल यादीत आहे की नाही? कसं तपासायचे? वाचा सविस्तर