Last Updated:
Property Law : भारतामध्ये मालमत्तेच्या वाटणीबाबत अनेकदा वाद निर्माण होतात, विशेषतः मुलींना हक्क नाकारले जातात. मात्र, कायद्यानुसार मुलींनाही मुलांइतकाच समान हक्क आहे.
मुंबई : भारतामध्ये मालमत्तेच्या वाटणीबाबत अनेकदा वाद निर्माण होतात, विशेषतः मुलींना हक्क नाकारले जातात. मात्र, कायद्यानुसार मुलींनाही मुलांइतकाच समान हक्क आहे. 2005 मध्ये हिंदू वारसाहक्क कायद्यात (Hindu Succession Act, 1956) महत्त्वाची सुधारणा करण्यात आली, जी मुलींसाठी टप्पा ठरली.
आजही अनेक कुटुंबांमध्ये कायदेशीर माहितीअभावी मुलींना मालमत्तेतील त्यांचा हक्क मिळत नाही. त्यामुळे समाजात अनेक गैरसमज आहेत की वडिलांच्या मालमत्तेत मुलीचा वाटा असतो की नाही? वडील जर मुलीला बेदखल करत असतील, तर तिला काही अधिकार राहतो का? हेच आपण जाणून घेणार आहोत.
कायदा काय सांगतो?
1) वडिलोपार्जित मालमत्तेवर समान अधिकार
2005 च्या सुधारणेनंतर, मुलीला वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत मुलाइतकाच हक्क आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही जन्मतःच वडिलोपार्जित मालमत्तेचे सह-हक्कदार मानले जातात.
2) वाटपात अन्याय झाल्यास न्यायालयाचा आधार
जर मालमत्तेच्या वाटणीदरम्यान मुलीला तिचा न्याय्य वाटा दिला गेला नसेल, तर ती कायद्याच्या आधारे न्यायालयात दावा करू शकते. यासाठी तिने सिद्ध करणे आवश्यक आहे की ती वडिलोपार्जित हक्कदार आहे.
मुलीला कधी हक्क मिळत नाही?
1)वडील स्वतः कमावलेली मालमत्ता
जर वडिलांनी स्वतः मेहनतीने कमावलेली मालमत्ता असेल आणि त्यांनी ती इच्छापत्राद्वारे कोणालाही (मुलगा/इतर व्यक्ती) देण्याचा निर्णय घेतला असेल, तर मुलीला त्या संपत्तीवर कायदेशीर हक्क राहत नाही.
2) इच्छापत्राच्या आधारे हक्क नाकारता येतो
स्वतःची मिळकत असलेल्या मालमत्तेच्या बाबतीत वडील आपल्या इच्छेनुसार इच्छापत्र (Will) तयार करून कोणत्याही एका मुलाला संपत्ती देऊ शकतात. या स्थितीत इतर मुलं, मुली किंवा पत्नीही त्या निर्णयाला कोर्टात आव्हान देऊ शकत नाहीत. जोपर्यंत इच्छापत्र वैध आहे.
Mumbai,Maharashtra
June 13, 2025 12:05 PM IST
वडिलांनी मालमत्तेसंदर्भातील हा एक निर्णय घेतला तर तुम्हाला कोर्टातही मिळणार नाही न्याय, वाचा नियम