आरोग्य आणि संधी
उन्हाळ्यात अत्यंत पसंतीस उतरणारे लीची हे फळ केवळ चवीलाच नव्हे, तर आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ‘सी’, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक ऊर्जा असते. यामुळेच बाजारात याची मागणी एप्रिल ते जूनदरम्यान कमालीची वाढते.
कुठे करता येईल लीचीची शेती?
राज्यातील कोकण, नाशिक, कोल्हापूर, सातारा आणि औरंगाबादसारख्या जिल्ह्यांमध्ये थोडासा गारवा आणि भरपूर निचरा असलेली जमीन उपलब्ध असल्याने, त्या भागांमध्ये लीची लागवडीस भरपूर संधी आहे. हलकी ते मध्यम चिकणमाती जमीन लीचीसाठी उत्तम मानली जाते.
लागवडीचा योग्य वेळ आणि पद्धत
जून-जुलै महिन्यात लावणी केल्यास लीचीची रोपं चांगली रुजतात. प्रत्येक रोपात किमान 6 मीटरचं अंतर ठेवण्याची गरज असते, जेणेकरून झाडं पूर्ण वाढू शकतील. एक हेक्टर क्षेत्रात सरासरी 280 ते 300 झाडी झाडं लावता येतात.
फळधारणेची वाटचाल आणि उत्पन्न
या झाडांना फळ देण्यासाठी 4-5 वर्षांचा कालावधी लागतो. त्यानंतर प्रत्येक झाड वर्षाकाठी 50 किलोपर्यंत फळं देऊ शकतं. बाजारात याला सरासरी 120 ते 300 रुपये प्रतिकिलो दर मिळतो, त्यामुळे शेतकऱ्याला एका हेक्टरातून 12 ते 15 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता असते.खर्च वगळता निव्वळ नफा 6 ते 8 लाख रुपयांपर्यंत पोहोचतो.
प्रक्रिया उद्योगाची जोड
लीचीपासून केवळ फळ विक्रीच नव्हे, तर त्यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या जॅम, स्क्वॅश, सिरप यांना मोठी बाजारपेठ मिळू शकते. स्थानिक विक्रीपेक्षा ऑनलाईन, शेतकरी थेट ग्राहक विक्री आणि हॉटेल पुरवठा साखळी अधिक फायदेशीर ठरत आहे.
दरम्यान, बदलत्या हवामानात आणि वाढत्या महागाईत लीचीसारखी फळपिकं उत्पन्नात स्थिरता व वाढीची हमी देतात. कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळवायचं असेल, तर लीची शेती हा एक शाश्वत आणि भविष्यकाळासाठी योग्य निर्णय ठरू शकतो.
Mumbai,Maharashtra
May 26, 2025 11:18 AM IST