By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : जमीन तुकडेबंदीचा कायदा रद्द पण बांधकामासाठीच्या नवीन नियम-अटी काय?
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : जमीन तुकडेबंदीचा कायदा रद्द पण बांधकामासाठीच्या नवीन नियम-अटी काय?
टॉप स्टोरीज़

Agriculture News : जमीन तुकडेबंदीचा कायदा रद्द पण बांधकामासाठीच्या नवीन नियम-अटी काय?

News Desk
Last updated: 2025/07/16 at 9:04 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:July 16, 2025 2:16 PM IST

Agriculture News : राज्यातील जमीनधारकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी पुढे आली आहे. महाराष्ट्र महसूल विभागाने तुकडाबंदी कायद्यात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे 5 लाखांहून अधिक कुटुंबांना थेट लाभ होणार आहे.

agriculture news

मुंबई : राज्यातील जमीनधारकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी पुढे आली आहे. महाराष्ट्र महसूल विभागाने तुकडाबंदी कायद्यात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे 5 लाखांहून अधिक कुटुंबांना थेट लाभ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना आता मार्ग मोकळा होणार आहे.

तुकडाबंदी कायदा नेमका काय आहे?

तुकडाबंदी कायद्यानुसार, जमिनीचे अतिशय लहान तुकडे विभाजित करून खरेदी-विक्री करता येत नाहीत. या कायद्याचा उद्देश अनियोजित शहरविकास टाळणे आणि शेतीयोग्य जमिनीचे विघटन रोखणे हा होता. मात्र, या कायद्यामुळे अनेक रहिवासी भागांतील लहान भूखंड विक्रीसाठी आणि नोंदणीसाठी अडथळा ठरत होते.

नवीन सुधारणांनुसार काय बदल होणार?

नवीन धोरणानुसार, राज्यातील ज्या गावांमध्ये वस्ती विकसित झाली आहे आणि जिथे जमिनीला निवासी वापरासाठी अधिकृत मान्यता मिळालेली आहे, अशा ठिकाणी तुकडाबंदी कायदा रद्द करण्यात येणार आहे. तसेच अशा भागांतील लहान भूखंडांची खरेदी-विक्री कायदेशीररीत्या करता येईल. भूखंड नोंदणीला आणि मालकी हक्क मिळवण्याला कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही. विशेषतः 1000 चौरस फूट किंवा त्याहून कमी क्षेत्रफळ असलेल्या भूखंडधारकांना याचा थेट फायदा होईल.

बांधकामासाठी अटी काय?

मालकी हक्क देण्यात शिथिलता मिळाल्याची घोषणा झाली असली तरी, त्या भूखंडांवर बांधकाम करण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती लागू राहणार आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत जसे की,

जमीन आरक्षित नसावी – भूखंड उद्यान, शाळा, रस्ते, सार्वजनिक सुविधा अशा आरक्षित जमिनीत येत नसावा.

किमान 6 मीटर रुंदीचा रस्ता – भूखंडापर्यंत पोहोचण्यासाठी किमान सहा मीटर रुंदीचा सार्वजनिक रस्ता असणे आवश्यक आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेचे नियम – बांधकाम करताना संबंधित महानगरपालिका, नगर परिषद किंवा ग्रामपंचायतीचे एफएसआय, सेटबॅक, उंची मर्यादा यांसारखे सर्व नियम लागू राहतील.

कोणाला होणार फायदा?

ज्यांच्याकडे लहान भूखंड आहेत आणि त्यावर मालकी हक्काची अडचण होती, अशांना फायदा जे प्लॉट विक्रीसाठी नोंदणी करू शकत नव्हते, त्यांना आता व्यवहार खुलेपणाने करता येतील. ज्यांना लहान भूखंडांवर बांधकाम करण्याची योजना आहे, त्यांना आता अधिक स्पष्ट मार्गदर्शन मिळेल.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 16, 2025 2:16 PM IST

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Property Rules : पर्याय नाही! हे मुलं वडिलांच्या मालमत्तेवरचा हक्क गमावणार, नियम काय सांगतो?
Next Article अल्पभूधारक शेतकऱ्यानं डोकं चालवलं, अर्ध्या एकरात लावली पैशाची बाग, आता लाखात कमाई!
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

टीसीएस खंडपीठाचे धोरण शोषण – आयटी कर्मचारी संघटनेने कामगार मंत्रालयाला पाठविले – आयटी कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे
Business July 17, 2025
Agriculture News : PM धनधान्य कृषी योजनेचा कोणत्या शेतकऱ्यांना होणार लाभ? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
टॉप स्टोरीज़ July 17, 2025
अनावश्यक खर्चावर दबाव, आयटी क्षेत्र सुधारते
Business July 17, 2025
कृषी हवामान : वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होणार, या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
टॉप स्टोरीज़ July 17, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?