By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Weather Latest Update : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुढील 3 दिवस धोक्याचे, या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Weather Latest Update : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुढील 3 दिवस धोक्याचे, या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी
टॉप स्टोरीज़

Weather Latest Update : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुढील 3 दिवस धोक्याचे, या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी

News Desk
Last updated: 2025/05/25 at 1:33 PM
News Desk
Share
2 Min Read

मान्सूनचे यंदाचे लवकर आगमन

हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा पोषक वातावरणामुळे मान्सून 13 मे रोजीच अंदमान-निकोबार बेटांपासून ते बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये दाखल झाला होता. नेहमी 20 ते 25 मे दरम्यान सुरू होणारा मान्सून यंदा 13 दिवस आधीच सुरू झाला.

बंगालच्या उपसागरातील बदलती हवामान परिस्थिती आणि अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण मिळाले. परिणामी, शनिवारी तो केरळसह माहे, दक्षिण व मध्य अरबी समुद्र, लक्षद्वीप, कोमोरीन, तामिळनाडूचा काही भाग, मिझोराम आणि इतर भागांपर्यंत पोहोचला.

16 वर्षांनंतर ऐतिहासिक घटना

या आधी 23 मे 2009 रोजी मान्सून केरळमध्ये वेळेपेक्षा नऊ दिवस आधी दाखल झाला होता. त्यानंतर तब्बल 16 वर्षांनी पुन्हा एकदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा लवकर केरळमध्ये पोहोचल्याचे पाहायला मिळाले. यामुळे हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनची नोंद ऐतिहासिक अशी केली आहे.

या भागांना रेड अलर्ट जारी

महाराष्ट्रात सध्या मान्सूनपूर्व वळवाचा पाऊस जोरात बरसत आहे. गेल्या चार-पाच दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने रविवारी पुणे, कोल्हापूर, सातारा, कोकण परिसरात ‘रेड अलर्ट’ जाहीर केला असून, येत्या दोन-तीन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईसह कोकणात यलो अलर्ट

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज असून, 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

मान्सूनचा संपूर्ण प्रवास

मान्सून सहसा 1 जूनच्या आसपास भारतात दाखल होतो आणि 8 जूनपर्यंत बहुतांश देश व्यापतो. 17 सप्टेंबरच्या सुमारास त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून निरोप घेतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मान्सून केरळमध्ये लवकर किंवा उशिरा दाखल झाला म्हणजेच तो देशभरातही तसाच राहील, असे निश्चित सांगता येत नाही. हे पूर्णपणे वातावरणातील स्थितींवर अवलंबून असते.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुढील 3 दिवस धोक्याचे, या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी

TAGGED: latest weather news, monsoon 2025, monsoon latest news, monsoon update, red alert, weather news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी, हवामान, हवामान अंदाज
Previous Article Agriculture News : पावसाळ्यात व्हा लखपती! शेतात 5 पिकांची लागवड करा, बक्कळ पैसा कमवा
Next Article Agriculture News: शेतकऱ्यांसाठी अलर्ट, हा मान्सून नव्हे, पेरणीचा विचार करत असेल तर थांबा, कृषि विभागाकडून धोक्याचा इशारा
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आर्थिक चिंता असूनही, वाढीची गती कायम आहेः इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी – आर्थिक चिंता असूनही वाढीची गती अखंड इन्फोसिसचे अध्यक्ष निलेकानी
Business June 25, 2025
जीएसीएम तंत्रज्ञान: जीएसीएम तंत्रज्ञानाने व्हीएक्सएल एज्युकेटमध्ये 30 % भागभांडवल प्राप्त केले- जीएसीएम तंत्रज्ञान व्हीएक्सएल शिक्षणात 30 टक्के हिस्सा आहे
Business June 25, 2025
Agriculture News : महत्वाची अपडेट! राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काय?
टॉप स्टोरीज़ June 25, 2025
Farmer Success Story: 2 हजार कोंबड्या, चार तासांची मेहनत अन् दरमहा दीड लाखांचा नफा, शेतकऱ्यानं कसा केला यशस्वी प्रयोग?, Video
टॉप स्टोरीज़ June 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?