Last Updated:
Minister Bawankule : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी नागरिकांनी तहसीलदारांविरोधात तक्रारी केल्या.ज्यामुळे मंत्री बावनकुळे यांनी थेट तहसीलदारांना फोन लावत चांगलाच दम भरला आहे.
मुंबई : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी नागरिकांनी तहसीलदारांविरोधात तक्रारी केल्या.ज्यामुळे मंत्री बावनकुळे यांनी थेट तहसीलदारांना फोन लावत चांगलाच दम भरला आहे.
10 पैकी 8 तक्रारी तुमच्या
मंत्री बावनकुळे यांनी तहसीलदाराला फोन लावत चांगलेच झापले. ते म्हणाले की, 10 पैकी 8 तक्रारी तुमच्या आहेत.एका ठराविक काल मर्यादेत काम करण्याचे अधिकऱ्यांना बंधन घाला आणि वेळेत कामं पूर्ण करा. असं म्हणत खडेबोल सुनावले.
दरम्यान, बावनकुळे यांच्या या क्रियेमुळे नागरिकांनी त्यांचे चांगलेच कौतुक केले आहे. तसेच प्रत्येक मंत्र्याने असच काम करावे अशी भावना व्यक्त केली आहे.
महसूल विभागाचा मोठा निर्णय
शेतीच्या वाटणीनंतर होणाऱ्या नोंदणीसाठी आकारली जाणारी नोंदणी फी पूर्णतः माफ करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ओझं कमी होणार असून कायदेशीर प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होईल.
आत्तापर्यंत शेती आणि बिगरशेती मिळकतींसाठी एकसमान नोंदणी फी आकारली जात होती. ती मिळकतीच्या एकूण मूल्याच्या 1 टक्क्यांपर्यंत, कमाल 30,000 रुपये इतकी होती. शेती मिळकतीसाठी मुद्रांक शुल्क केवळ 100 रुपये असूनही नोंदणी फी माफ नव्हती. यामुळे अनेक शेतकरी वाटपाचे दस्त नोंदवण्याचे टाळत होते. परिणामी भविष्यात कुटुंबांत वाद निर्माण होत होते, व त्यातून कायदेशीर गुंतागुंत व मानसिक त्रास वाढत होता. मात्र यातून आता सुटका मिळणार आहे.
Mumbai,Maharashtra
May 28, 2025 11:13 AM IST
मंत्री बावनकुळेंचा रुद्रावतार! तहसीलदाराला फोन लावून म्हणाले, तुमच्या.. पाहा Video