By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: पीक नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार! पण कधी? मंत्री जाधव-पाटील यांनी दिली माहिती
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > पीक नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार! पण कधी? मंत्री जाधव-पाटील यांनी दिली माहिती
टॉप स्टोरीज़

पीक नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार! पण कधी? मंत्री जाधव-पाटील यांनी दिली माहिती

News Desk
Last updated: 2025/07/03 at 10:20 AM
News Desk
Share
2 Min Read

Last Updated:July 03, 2025 3:23 PM IST

Agriculture News : सन 2023–24 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून सुमारे 445 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

agriculture news

मुंबई : सन 2023–24 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून सुमारे 445 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यातील 245 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आले असून, उर्वरित रक्कम लवकरच देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी ही माहिती विधानसभेत दिली. ते म्हणाले की, उर्वरित निधी दोन ते तीन दिवसांत डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.

शेतकऱ्यांचा आधारभूत पाठिंबा कायम

“शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे,” असे मंत्री जाधव-पाटील यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, एनडीआरएफच्या निकषांपेक्षा कमी मदत कोणत्याही शेतकऱ्याला दिली जाणार नाही.

शेतपिकांचे नुकसान झाल्यानंतर संबंधित विभागांकडून तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाला पाठवला जातो. अहवाल प्राप्त होताच शेतकऱ्यांना मदत वितरित केली जाते.

बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान

बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर, लोणार, चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये गेल्या काही काळात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.

65 मिमीहून अधिक पाऊस झाल्याने 50,397 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, मूग, भाजीपाला या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिसरात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत तातडीने मिळावी, यासाठी पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

अहवालानंतर तातडीची मदत

मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले की, “बाधित शेती व घरांच्या नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच, एनडीआरएफच्या निकषांनुसार तात्काळ मदतीचे वितरण सुरू होईल. शासनाकडून शेतकऱ्यांना यापुढेही वेळेत मदत मिळेल, याची काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

July 03, 2025 3:23 PM IST

मराठी बातम्या/कृषी/

पीक नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार! पण कधी? मंत्री जाधव-पाटील यांनी दिली माहिती

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article चीन सायलेंट मंजुरीः भारताच्या उत्पादनावर चीनचा नवीन हल्ला! प्रतिभेवर ‘मूक मंजुरी’ सह एक खळबळ उडाली होती – चीन शांतपणे भारत उत्पादन महत्वाकांक्षा व्यत्यय आणण्यासाठी प्रतिभा रोखत आहे
Next Article स्टार्टअप्स खेळपट्टीवरील कोहलीचा ‘विराट’ सामना, ₹ 2.5 कोटी आणि k 30k कोटींच्या कंपनीत – Rs० कोटी रुपये गुंतवणूकीने आता 00०००० कोटी रुपये कंपनी विराट कोहली आता स्टार्टअप्समध्ये खरा खेळ खेळत आहे.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : पावसाळ्यात शेतातील शंख गोगलगायचा प्रभाव कसा कमी करायचा? वाचा सविस्तर
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
Agriculture News : शेतकऱ्यांनो! फक्त 50,000 रुपयांत सुरू करा व्यवसाय, आयुष्यभर कराल लाखांत कमाई
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
Success Story: नोकरीत काय आहे? उच्चशिक्षित तरुणाने घेतल्या 10 गायी, आता कमतोय पैसाच पैसा! Video
टॉप स्टोरीज़ July 4, 2025
Pik Vima: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, फळपीक विमा काढण्याची शेवटची संधी, उरले फक्त 2 दिवस!
टॉप स्टोरीज़ July 4, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?