By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Beed : उन्हाने घेतला 180 इवल्याश्या जिवांचा जीव, शेतकरी ढसाढसा रडला
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Beed : उन्हाने घेतला 180 इवल्याश्या जिवांचा जीव, शेतकरी ढसाढसा रडला
टॉप स्टोरीज़

Beed : उन्हाने घेतला 180 इवल्याश्या जिवांचा जीव, शेतकरी ढसाढसा रडला

News Desk
Last updated: 2025/05/06 at 1:06 AM
News Desk
Share
2 Min Read

Contents
विकास तिडके यांनी पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी घरच्या व्यवसायातून साठवलेले पैसे आणि थोडसं कर्ज घेतलं होतं. मोठ्या अपेक्षेने सुरू केलेल्या या व्यवसायात अचानक एवढं मोठं नुकसान झाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.News18

Last Updated:April 21, 2025 3:41 PM IST

विकास तिडके यांनी पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी घरच्या व्यवसायातून साठवलेले पैसे आणि थोडसं कर्ज घेतलं होतं. मोठ्या अपेक्षेने सुरू केलेल्या या व्यवसायात अचानक एवढं मोठं नुकसान झाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

X

News18

बीड : राज्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. यामुळे याचा नागरिकांना नाहीतर पशुपक्षांना त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हामुळे कुकुटपालन व्यवसायावर परिणाम पहिला मिळत असून बीडमधील शेतकऱ्याच्या कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

बीड जिल्ह्यातील नित्रुड गावातील विकास तिडके यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यावर शिक्षण सोडून थेट व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्यांदा गॅरेजचा व्यवसाय सुरू केला. गाड्यांची दुरुस्ती करताना त्यांनी खूप मेहनत घेतली. मात्र खर्च वजा जाता त्यांना हवा तसा नफा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांना व्यवसायात फार समाधान मिळत नव्हते. त्यामुळे काहीतरी नवीन करण्याचा विचार त्यांच्या मनात आला.

एका मित्राच्या सल्ल्यानुसार विकास तिडके यांनी पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी थोडक्याच गुंतवणुकीत कोंबड्यांचे पालन सुरू केले. काही काळातच त्यांना या व्यवसायातून चांगला नफा मिळायला लागला. त्यामुळे त्यांनी गॅरेजचा व्यवसाय बंद करून पूर्ण लक्ष पोल्ट्री फार्मवर केंद्रित केले. मेहनतीच्या जोरावर त्यांनी व्यवसाय चांगल्या प्रकारे उभा केला आणि नफाही वाढवला.

मात्र अलीकडच्या काळात वाढत्या तापमानामुळे त्यांच्या व्यवसायावर मोठे संकट आले आहे. गेल्या काही दिवसांपासून फार्ममधील कोंबड्या मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडत आहेत. दिवसाला जवळपास 180 ते 190 कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. उष्णतेचा परिणाम इतका वाढला आहे की कोंबड्या ताप सहन न करता मरत आहेत. यामुळे त्यांचे हजारोंचे नुकसान झाले आहे .

विकास तिडके यांनी पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी घरच्या व्यवसायातून साठवलेले पैसे आणि थोडसं कर्ज घेतलं होतं. मोठ्या अपेक्षेने सुरू केलेल्या या व्यवसायात अचानक एवढं मोठं नुकसान झाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. एकीकडे कर्जाचा हप्ता भरण्याची जबाबदारी आहे आणि दुसरीकडे व्यवसायावर आलेले संकट आहे. त्यामुळे त्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

Location :

Bid,Maharashtra

First Published :

April 21, 2025 4:04 PM IST

TAGGED: agriculture, Beed, chicken care, chicken care in summer, chicken death, chicken death due to heat, Effect of heat on poultry farming, उन्हामुळे कोंबड्यांचा मृत्यू, उन्हाळ्यात कोंबड्याची काळजी, कुकुटपालन व्यवसायावर उष्णतेचा प्रभाव, कृषी, कोंबड्यांचा मृत्यू, कोंबड्याची काळजी
Previous Article दिवाळखोरी आणि कर्ज उपचार प्रक्रियेत नवीन वादविवादः रिझोल्यूशन व्यावसायिकांच्या उत्तरदायित्वावरील सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आदेश – दिवाळखोरी आणि कर्ज उपचार प्रक्रियेतील नवीन वादविवादाच्या समाधानाच्या उत्तरदायित्वावरील सर्वोच्च न्यायालये ऐतिहासिक आदेश
Next Article ईपीएफओला ऑफिस आणि लँडची आवश्यकता आहे, थेट बीएसएनएल -एमटीएनएल – ईपीएफओमध्ये जमीनी आणि कार्यालयांसाठी बोलण्यात येईल.
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : करोडपती होण्याची संधी! 1 एकरात 600 झाडी लावा, 30 कोटी रु पर्यंत उत्पन्न मिळवा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
Agriculture News : पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
10 गुंठ्यात लावला काश्मिरी गुलाब, दिवसाला 3 हजार कमाई, शेतकऱ्याचं नशीबचं पालटलं!
टॉप स्टोरीज़ May 24, 2025
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा
टॉप स्टोरीज़ May 24, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?