Last Updated:
विकास तिडके यांनी पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी घरच्या व्यवसायातून साठवलेले पैसे आणि थोडसं कर्ज घेतलं होतं. मोठ्या अपेक्षेने सुरू केलेल्या या व्यवसायात अचानक एवढं मोठं नुकसान झाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
बीड : राज्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. यामुळे याचा नागरिकांना नाहीतर पशुपक्षांना त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हामुळे कुकुटपालन व्यवसायावर परिणाम पहिला मिळत असून बीडमधील शेतकऱ्याच्या कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
बीड जिल्ह्यातील नित्रुड गावातील विकास तिडके यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यावर शिक्षण सोडून थेट व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्यांदा गॅरेजचा व्यवसाय सुरू केला. गाड्यांची दुरुस्ती करताना त्यांनी खूप मेहनत घेतली. मात्र खर्च वजा जाता त्यांना हवा तसा नफा मिळत नव्हता. त्यामुळे त्यांना व्यवसायात फार समाधान मिळत नव्हते. त्यामुळे काहीतरी नवीन करण्याचा विचार त्यांच्या मनात आला.
एका मित्राच्या सल्ल्यानुसार विकास तिडके यांनी पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी थोडक्याच गुंतवणुकीत कोंबड्यांचे पालन सुरू केले. काही काळातच त्यांना या व्यवसायातून चांगला नफा मिळायला लागला. त्यामुळे त्यांनी गॅरेजचा व्यवसाय बंद करून पूर्ण लक्ष पोल्ट्री फार्मवर केंद्रित केले. मेहनतीच्या जोरावर त्यांनी व्यवसाय चांगल्या प्रकारे उभा केला आणि नफाही वाढवला.
मात्र अलीकडच्या काळात वाढत्या तापमानामुळे त्यांच्या व्यवसायावर मोठे संकट आले आहे. गेल्या काही दिवसांपासून फार्ममधील कोंबड्या मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडत आहेत. दिवसाला जवळपास 180 ते 190 कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. उष्णतेचा परिणाम इतका वाढला आहे की कोंबड्या ताप सहन न करता मरत आहेत. यामुळे त्यांचे हजारोंचे नुकसान झाले आहे .
विकास तिडके यांनी पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी घरच्या व्यवसायातून साठवलेले पैसे आणि थोडसं कर्ज घेतलं होतं. मोठ्या अपेक्षेने सुरू केलेल्या या व्यवसायात अचानक एवढं मोठं नुकसान झाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. एकीकडे कर्जाचा हप्ता भरण्याची जबाबदारी आहे आणि दुसरीकडे व्यवसायावर आलेले संकट आहे. त्यामुळे त्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
Bid,Maharashtra
April 21, 2025 4:04 PM IST