भारतीय कायदा काय सांगतो?
भारतात वारस हक्क (उत्तराधिकार) वेगवेगळ्या कायद्यांवर आधारित आहे. विशेषतः हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, संपत्तीवर थेट हक्क फक्त पत्नी, मुले, आई-वडील आणि भावंडांनाच असतो.
जावई हा ‘खूनाचा नातेसंबंध’ नसल्यामुळे सासऱ्याच्या संपत्तीचा नैसर्गिक किंवा कायदेशीर वारस ठरत नाही.
जावयाला संपत्ती कशी मिळू शकते?
जर सासऱ्याने स्वतःची मिळवलेली (स्वअर्जित) संपत्ती वसीयत किंवा गिफ्ट डीड द्वारे जावयाच्या नावे केली असेल, तर तो हक्क वैध ठरतो. म्हणजेच, सासऱ्याच्या इच्छेवर आणि अधिकृत कागदपत्रांवर सर्वकाही अवलंबून असतं.
विशेष परिस्थिती काय?
जर जावयाने सासऱ्याच्या संपत्तीच्या खरेदीमध्ये आर्थिक मदत केली असेल आणि त्याचे ठोस पुरावे असतील, तर काही प्रमाणात तो दावा करू शकतो. पण हे न्यायालयात सिद्ध करावं लागतं.
जर सासऱ्याचा मृत्यू झाला आणि त्यांची मुलगी (जावयाची पत्नी) संपत्तीची वारस ठरली, आणि तिच्या मृत्यूनंतर वसीयत नसल्यास, तेव्हा जावई अप्रत्यक्षरित्या त्या संपत्तीवर हक्क सांगू शकतो.
थेट वारसा नाही!
जावयाला सासऱ्याच्या संपत्तीवर स्वतःहून थेट हक्क नाही. मात्र, विशिष्ट कागदपत्रे (वसीयत/गिफ्ट डीड) किंवा पत्नीच्या मृत्यूनंतरच्या उत्तराधिकारी प्रक्रियेमुळे काही हक्क प्राप्त होऊ शकतात.
दरम्यान, अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये कायदेशीर सल्ला घेणे आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित ठेवणे फार महत्त्वाचे आहे. चुकीच्या अपेक्षांमुळे गैरसमज आणि वाद वाढू शकतात.
Mumbai,Maharashtra
April 28, 2025 3:30 PM IST
सासऱ्याच्या जमीन, मालमत्तेवर जावई दावा करू शकतो का? कायदा काय सांगतो? वाचा सविस्तर