By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: IND VS PAK : शेतकऱ्यांपासून ते सामान्य जनतेपर्यंत! युद्ध झाल्यास या वस्तूंच्या किंमती दाखवणार आस्मान
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > IND VS PAK : शेतकऱ्यांपासून ते सामान्य जनतेपर्यंत! युद्ध झाल्यास या वस्तूंच्या किंमती दाखवणार आस्मान
टॉप स्टोरीज़

IND VS PAK : शेतकऱ्यांपासून ते सामान्य जनतेपर्यंत! युद्ध झाल्यास या वस्तूंच्या किंमती दाखवणार आस्मान

News Desk
Last updated: 2025/05/10 at 3:04 AM
News Desk
Share
2 Min Read

भारताच्या पंजाब, राजस्थान, जम्मू-कश्मीर आणि हरियाणा या सीमावर्ती राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन होते. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे या भागांतील शेती अडचणीत येते. सिंचनासाठी लागणाऱ्या पाणीपुरवठ्यावर मर्यादा येतात, बियाण्यांचे वेळेवर वाटप होत नाही, ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्रीचा वापर अडचणीत येतो, तसेच मजूरांची टंचाई निर्माण होते. परिणामी गहू, तांदूळ, डाळी, साखर यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनात घट येऊन त्यांच्या किमतीत लक्षणीय वाढ होण्याचा धोका निर्माण होतो.

भाजीपाला आणि फळांचेही असाच परिणाम होतो. युद्धामुळे महामार्ग, रेल्वे आणि इतर वाहतूक मार्ग बाधित होतात. याचा परिणाम म्हणजे टोमॅटो, कांदा, बटाटा, फळे इत्यादींचा वेळेवर पुरवठा होत नाही. शहरांमध्ये या वस्तूंची टंचाई भासते आणि त्यामुळे त्यांचे दर दुप्पट-तिप्पट होण्याची शक्यता असते. याचा सर्वांत मोठा फटका मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गाला बसतो.

शेतीसाठी आवश्यक असलेल्या खते, बियाणे, औषधे आणि यंत्रसामग्री यांचा मोठा भाग देशांतर्गत तसेच आयातीच्या माध्यमातून उपलब्ध होतो. युद्धाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन व वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्यास या वस्तू वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी, पुढील हंगामात उत्पादनात घट होऊन अन्नधान्याची कमतरता आणि महागाई वाढते.

डिझेल हे शेतीतील यंत्रसामग्री, सिंचन आणि वाहतुकीसाठी आवश्यक इंधन आहे. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढतात, जे भारतातही महागाईचा भडका उडवतात. डिझेल महाग झाल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो आणि त्यांच्या नफ्यात घट होते, परिणामी ते आर्थिक अडचणीत सापडतात.

युद्धाचा परिणाम केवळ शेतीपर्यंत सीमित राहत नाही. ग्रामीण भागातील बाजारपेठा, रोजगाराचे स्रोत आणि शेतीवर आधारित लघुउद्योगांवरही त्याचा परिणाम होतो. सरकार युद्धासाठी अधिकचा निधी खर्च करत असल्याने कृषी अनुदान, विमा योजना, सेंद्रिय शेती यांना मिळणारा पाठिंबा तात्पुरता स्थगित केला जाऊ शकतो. यामुळे शेतकरी कुटुंबांची क्रयशक्ती कमी होते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक अस्थिर होते.

एकूणच, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यास, त्याचा सगळ्यात खोलवर परिणाम भारताच्या अन्नसुरक्षा आणि ग्रामीण जीवनशैलीवर होणार आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

IND VS PAK : शेतकऱ्यांपासून ते सामान्य जनतेपर्यंत! युद्ध झाल्यास या वस्तूंच्या किंमती दाखवणार आस्मान

TAGGED: agriculture, agriculture news, farmer, ind vs pak, ind vs pak latest update, ind vs pak war, latest agriculture news, कृषी, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article Q4 परिणामः बीओआय ते युनियन बँकेपर्यंत स्विगी, कोणत्या कंपनीने क्यू 4 मध्ये कमाई केली आणि गमावले? – क्यू 4 स्विग्गी बोई ते युनियन बँकेपर्यंतच्या कोणत्या कंपनीने क्यू 4 मध्ये किती कानातले कमावले
Next Article IND VS PAK : मसाल्याच्या पदार्थांपासून ते कांद्यापर्यंत! भारत-पाक तणावाचा निर्यातीला फटका, किंमती भडकणार?
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना कोट्यवधींची मदत जाहीर! विभागनिहाय यादी वाचा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
‘मॅरियट बाय मालिका’ च्या प्रक्षेपणानंतर, आम्ही भारतीय cities ० शहरांपर्यंत पोहोचू, हॉस्पिटॅलिटीचे चित्र बदलू: मेनन – मॅरियट मिडस्केल सेगमेंटमध्ये प्रवेश करते आणि मालिकेच्या ब्रँडने भारतीय हॉस्पिटॅलिटीमध्ये नवीन अध्याय चिन्हांकित केले आहे.
Business May 25, 2025
Agriculture News : करोडपती होण्याची संधी! 1 एकरात 600 झाडी लावा, 30 कोटी रु पर्यंत उत्पन्न मिळवा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
Agriculture News : पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?