Last Updated:
Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2025 मध्ये मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कृषी विभागामार्फत Mahadbt पोर्टलवर अर्ज मागवण्यात आलेल्या प्रमाणित बियाण्यांच्या वाटपासाठी सोडत (ड्रॉ) काढण्यात आली आली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2025 मध्ये मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कृषी विभागामार्फत Mahadbt पोर्टलवर अर्ज मागवण्यात आलेल्या प्रमाणित बियाण्यांच्या वाटपासाठी सोडत (ड्रॉ) काढण्यात आली असून, 3 जून 2025 रोजी ही सोडत जाहीर करण्यात आली आहे.
निवड झालेल्या लाभार्थ्यांना यासंदर्भातील SMS पाठवण्यात आले आहेत, आणि त्यांना पुढील पाच दिवसांच्या आत संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बियाणे उचलण्यासंदर्भातील महत्त्वाचे निर्देश
सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांनी, तालुकास्तरावरील कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून, त्यांना निर्दिष्ट केलेल्या कृषी सेवा केंद्रावरून बियाण्यांची उचल करावी. यासाठी 5 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत बियाणे न उचलल्यास निवड रद्द होऊ शकते आणि शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही.
बियाणे कोणत्या पिकांचे?
या योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी सोयाबीन, मका, भात, नाचणी, बाजरी, उडीद, मूग यांसारख्या पिकांच्या प्रमाणित बियाण्यांचे वाटप 100% अनुदानावर करण्यात येत आहे.
निवड यादी कशी पाहाल?
www.mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर लॉगिन करा.‘बियाणे वाटप यादी’ पर्यायावर क्लिक करा.तालुका आणि गाव निवडून PDF स्वरूपात यादी डाउनलोड करा. यादीत आपले नाव असल्यास, SMS येण्याची वाट पाहा किंवा थेट कृषी कार्यालयाशी संपर्क साधा
Mumbai,Maharashtra
June 04, 2025 3:18 PM IST