Last Updated:
Agriculture News : राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने, अतिवृष्टीने आणि पुरामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने, अतिवृष्टीने आणि पुरामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानीसाठी दिली जाणारी भरपाई रक्कम आता कपात करण्यात आली असून, केवळ दोन हेक्टरपर्यंतच शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेतला आहे.
मंत्रिमंडळ निर्णयानुसार बदललेली नुकसानभरपाई योजना
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा चर्चेला घेण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदानाच्या स्वरूपात मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पूर्वी कमाल तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याची तरतूद होती. मात्र आता ही मर्यादा दोन हेक्टरपर्यंत घटवण्यात आली आहे. तसेच भरपाईचे दरही केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पूर्वीप्रमाणेच मर्यादित ठेवले जाणार आहेत.
मागील निर्णय रद्द
डिसेंबर 2023 पर्यंत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत ठरलेल्या निकषांनुसारच मदत दिली जात होती. त्यानंतर 1 जानेवारी 2024 रोजी शिंदे सरकारने नवीन शासन निर्णय (GR) काढून मदतीचे दर आणि हेक्टर मर्यादा वाढवली होती. त्या निर्णयानुसार काही काळ वाढीव मदत देण्यात आली.
मात्र आता केंद्र सरकारने राज्य सरकारला कळवले आहे की, SDRF अंतर्गत दिली जाणारी मदत ही केंद्राने निश्चित केलेल्या मर्यादेतच असावी, याची अट बंधनकारक आहे. त्यामुळे आता 27 मार्च 2023 रोजी लागू असलेल्या निकषांनुसारच नुकसान भरपाई दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Mumbai,Maharashtra
June 01, 2025 12:00 PM IST
कृषी विभागाचा मोठा निर्णय! पीक नुकसान भरपाईच्या मदतीमध्ये केला बदल, वाचा सविस्तर